U-19 World Cup India vs Australia Final marathi news  sakal
क्रीडा

U-19 WC Ind vs Aus Final : रोहित शर्माचे स्वप्न उदय पूर्ण करणार? WTC, ODI वर्ल्डकपनंतर आता U-19 च्या फायनलमध्ये भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया

U-19 World Cup India vs Australia Final : भारत-ऑस्ट्रेलिया आज अंतिम सामना

Kiran Mahanavar

U-19 World Cup India vs Australia Final : रोहित शर्माच्या टीम इंडियाला तीन महिन्यांपूर्वी जे यश मिळवता आले नाही ते यश उदय सहारन याची १९ वर्षांखालील टीम मिळवणार का ? १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच भारताचे प्रतिस्पर्धी असणार आहे. हा सामना आज होणार आहे.

सीनियरमध्ये एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दोनदा पराभव करून विजेतेपद उंचावलेले आहे, पण १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत दोनदा ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीयांनी अजिंक्यपद मिळवलेले आहे. आज तिसऱ्यांदा हे वर्चस्व राखण्याची संधी असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा विजेतेपदाचा सन्मानही मिळवण्याची संधी असेल.

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ कमालीच्या फॉर्मात आहे. मुळात गतविजेते असल्याचा हे पाठबळ आहे. कर्णधार उदय सहारन, सचिन धस, मुशीर खान आणि गोलंदाज सौम्यकुमार पांडे यांनी आपला दरारा निर्माण केला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार वेबगेन, सलामीवीर हॅरी डिक्सन आणि वेगवान गोलंदाज टॉम स्टेकर व कॅलम विडलर यांचा धोका भारतीयांना होऊ शकतो. या स्पर्धेत त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या वाटचालीत मोलाची कामगिरी केलेली आहे.

ठिकाण : बिनोनी (दक्षिण आफ्रिका)

वेळ : दुपारी १.३० पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस आणि हॉटस्टार

हे खेळाडू आहेत फॉर्मात

यंदाच्या स्पर्धेत उदय सहारन सर्वाधिक ३८९ धावा करणारा फलंदाज आहे, तर डावखुरा फिरकी गोलंदाज सौम्य पांडेने सर्वात जास्त १७ विकेट मिळवलेल्या आहेत. मुशीर खाननेही शतकी खेळी साकार केलेली आहे, तर बीडचा हरहुन्नरी फलंदाज सचिन धस याचे सलग दुसरे शतक चार धावांनी हुकले होते.

इतिहास भारताच्या बाजूने

१९ वर्षांखालील विश्वकरंडक अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया २०१२ आणि २०१८ मध्ये एकमेकांशी भिडले होते. या दोन्ही वेळेस भारताने बाजी मारलेली आहे. २०१८ मध्ये पृथ्वी शॉ कर्णधार होता. त्या संघात शुभमन गिलही होता. तर २०१२ मध्ये उन्मुक्त चंद कर्णधार होता.

२०१६ च्या स्पर्धेपासून भारत प्रत्येक स्पर्धेत अंतिम सामने खेळलेला आहे. यात २०१८, २०२२ मध्ये विजेतेपद मिळवता आले, तर २०१६ आणि २०२० मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

हे खेळाडू झाले स्टार

१९ वर्षांखाली विश्वकरंडक स्पर्धेत खेळल्यानंतर भारताच्या मुख्य संघातून स्टार झालेल्या खेळाडूंमध्ये युवराज सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, केएल राहुल, रिषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ आणि उन्मुक्त चंद मागे पडले. चंदला तर मुख्य संघात स्थानही मिळाले नाही. गतवेळचा विजेता कर्णधार यश धुल यालाही मुख्य प्रवाहात येता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT