ind vs eng test cricket match india batting coach vikram rathore backs shubman gill and shreyas iyer ahead of visakhapatnam Sakal
क्रीडा

Ind Vs Eng : ‘बॅझबॉल’ला चतुराईने रोखावे लागेल; फलंदाजी प्रशिक्षकांनी केली गिल, श्रेयसची पाठराखण

क्रिकेट विश्वातील अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लिश फलंदाजांना स्वीप आणि रिव्हर्स स्वीपने नामोहरम केले.

सकाळ वृत्तसेवा

विशाखापट्टणम : क्रिकेट विश्वातील अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लिश फलंदाजांना स्वीप आणि रिव्हर्स स्वीपने नामोहरम केले. त्यांच्या या खेळाला चतुराईने उत्तर द्यावे लागेल, असे मत भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी व्यक्त केले. त्याच वेळी फॉर्म हरपलेल्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचीही पाठराखण केली.

भारतीय फिरकीवर स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचे अस्त्र वापरून इंग्लंड संघाने हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. त्यांचा नववा-दहाव्या क्रमांकावरील फलंदाजही या दोन फटक्यांचा वापर करत होता.

स्वीप किंवा रिव्हर्स स्वीपचे फटके एका रात्रीत तयार होत नसतात. त्यासाठी अगोदरपासून सराव करावा लागतो. आपल्या खेळात असे वैविध्यपूर्ण फटके आणले तर ते फायदेशीरच असतात; परंतु आम्ही पारंपरिक खेळावर भर दिला आहे, पायाचा वापर अधिक करून खेळणे असा आपला खेळ आहे, असे राठोर यांनी सांगितले.

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडचे फलंदाज या फटक्यांचा वापर करणार हे उघड आहे. त्यासाठी आम्हाला हुशारीने खेळ करावा लागेल, असेही राठोर म्हणाले. एकीकडे इंग्लिश फलंदाज भारतीय फिरकी माऱ्याला निष्प्रभ करण्यासाठी वेगवेगळ्या फटक्यांचा प्रयत्न करत आहेत,

पण त्याच वेळी भारताचे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरसारखे भरवशाचे फलंदाज साफ निराशा करत आहेत, याचाही फटका पहिला कसोटी सामना गमावण्यात बसला. पण राठोर यांनी त्यांची पाठराखण केली. या दोघांबाबत संयम राखायला हवा, असे ते म्हणतात.

गेल्या नऊ कसोटी डावांत गिलला अर्धशतक करता आलेले नाही, तर अय्यरने आपले अखेरचे कसोटी शतक दोन वर्षांपूर्वी झळकावलेले आहे.

हैदराबाद येथील कसोटीतील दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजांनी बेजबाबदार खेळ केला. प्रत्येकाने आपले ध्येय समोर ठेवून फलंदाजी करायला हवी होती. संयम महत्त्वाचा आहेच, पण धावा करणे हे फलंदाजाचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. शेवटी तुम्ही धावफलकावर किती धावा नोंदविल्या याचीच गणती केली जाते, अशा शब्दांत राठोर यांनी आपल्या फलंदाजांची कानउघाडणीही केली.

निवडीचे आव्हान

केएल राहुलच्या रिकाम्या झालेल्या जागेवर रजत पाटीदार किंवा सर्फराझ खान यापैकी एकाला संधी द्यावी लागणार आहे; परंतु या दोघांतून एकाची निवड करणे हे खरोखरीच आव्हानात्मक आहे, असे राठोर म्हणाले. दोघेही कसोटीसाठी नवखे आहेत; परंतु देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्यांनी भरपूर धावा केलेल्या आहेत. त्यातून एकाची निवड करण्याची वेळ आली तर ती डोकेदुखी असेल. शेवटी हा निर्णय रोहित आणि राहुल द्रविड यांना घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

कशी असेल खेळपट्टी

विशाखापट्टणमच्या खेळपट्टीचे भाकीत आताच करणे कठीण आहे. चेंडू कदाचित पहिल्या दिवसापासून फिरक घेणार नाही; परंतु तो उत्तरोत्तर फिरक घेणार, असे सध्या तरी वाटत आहे, असे राठोर यांनी सांगितले.

आक्रमक वृत्ती आणि ध्येयशक्ती असे दोन प्रकार असतात. आपल्या खेळाडूंनी ध्येयशक्तीला प्राधान्य देऊन खेळ करावा आणि धावा करण्याची संधी असेल तेथे निश्चितच फटकेबाजी करावी.

- विक्रम राठोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT