ind vs sa 5th t20 karnataka state cricket association 50 percent refund ticket 
क्रीडा

Ind vs Sa: पाऊस पडला मॅच रद्द, तिकिटाचे पैसे मिळणार पण किती?

शेवटच्या T20 सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले जाणार

Kiran Mahanavar

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. शेवटच्या T20 सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहे. यांची घोषणा कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने केले आहे. (Ind vs Sa 5th T-20 Karnataka State Cricket Association 50 Percent Refund Ticket)

नाणेफेकीनंतर खेळाडू मैदानावर पोहोचताच पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सामना 19-19 षटकांचा करण्यात आला. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि अखेर सामना रद्द करण्यात आला. सामन्यादरम्यान सतत पाऊस पडत होता आणि त्यामुळे शेवटचा हा निर्णायक सामना पावसामुळे रद्द केला आहे. सामना रद्द झाल्यानंतर टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली.

सामन्यात एकही चेंडू टाकल्यास तिकिटाचे पैसे परत केले जात नाही, असे KSCA चे धोरण आहे. क्रिकेट असोसिएशनने प्रेक्षकांच्या तिकिटांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. युनियनने म्हटले आहे की दर्शकांचे संपूर्ण पैसे परत केले जाणार नाहीत, परंतु 50 टक्के दिले जाणार आहे. केएससीएचे खजिनदार आणि प्रवक्ते विनय मृत्युंजय म्हणाले, अटी आणि शर्तींनुसार, एकही चेंडू टाकला तरी तिकिटांचे पैसे परत मिळत नाही. मात्र KSCA ने तिकिटाच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम क्रिकेट चाहत्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal CM: पश्चिम बंगालमध्ये BJP सरकार स्थापन करणार! मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची तारीखही ठरली; ब्रिगेड ग्राउंड साक्षीदार ठरणार

IPL 2026 : रोहित शर्मा पुन्हा Mumbai Indians चा कॅप्टन? हार्दिकनंतर सूर्यकुमार यादवही MI vs RCB सामन्याला मुकणार?

Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक नेहमीच करतात भेदभावाचा सामना; समाजात मिळतो अपमान, पण करियरमध्ये घेतात भरारी, बनतात लखपति

Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

IPL 2026 : हार्दिक पांड्याने Mumbai Indians च्या इतर खेळाडूंसोबत रायपूरला नाही गेला; RCB विरुद्ध नाही खेळणार? नेमकं काय सुरू आहे?

SCROLL FOR NEXT