India vs Sri Lanka 3rd T20I Arshdeep Singh sakal
क्रीडा

IND vs SL: टीम इंडियाचा 'हा' खेळाडू 48 तासात व्हिलन वरून बनला हिरो! शेवटच्या सामन्यात केला कहर

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 3rd T20I Arshdeep Singh : भारतीय संघाने श्रीलंकेचा टी-20 मालिकेत पराभव केला. राजकोटच्या SCA स्टेडियमवर शनिवारी खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना टीम इंडियाने 91 धावांनी जिंकला.

सूर्यकुमार यादवच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांत सर्वबाद झाला. दरम्यान असाही एक खेळाडू होता जो 48 तासात व्हिलन मधून बनला हिरो बनला होता.

भारतीय संघाने त्यांच्या यजमानपदी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचा 2-1 असा पराभव केला. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाने 20 षटकात 5 विकेट गमावून 228 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांवर गारद झाला. सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करत 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. शुभमन गिलने 46 तर अक्षर पटेलने 9 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.

अर्शदीप ठरला हिरो

पुण्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 'व्हिलन' बनला होता. त्याने त्या सामन्यात 5 नो बॉल फेकले होते. त्या सामन्यात भारताला 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. एवढेच नाही तर कर्णधार हार्दिक पांड्याने सामन्यानंतर सांगितले की, नो बॉल हा गुन्हा आहे. राजकोट टी-20 मध्ये हार्दिक त्याला संधी देणार नाही असे वाटत होते पण पांड्याने विश्वास ठेवला. आता 48 तासांनंतर झालेल्या सामन्यात अर्शदीपने चमकदार कामगिरी करत 2.4 षटकात 3 विकेट घेतले.

कर्णधार हार्दिक पांड्याने सामन्यानंतर सांगितले की, 'कर्णधार म्हणून माझ्या आयुष्याचा उद्देश मी माझ्या खेळाडूंना पाठिंबा देईन. तो भारतातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटू आहे आणि म्हणूनच ते येथे आहे. या फॉरमॅटमध्ये शंका घेण्यास जागा नाही आणि आम्ही योग्य मार्गाने खेळाडूंना पाठीशी घालत आहोत. आम्ही मालिकेत ज्या पद्धतीने खेळलो ते आनंददायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT