India Wins 2nd T20 against New Zealand  
क्रीडा

पंड्यानं अडकवलं.. रोहितनं बदडलं; भारताचा सहज विजय!

वृत्तसंस्था

वेलिंग्टन : कृणाल पंड्याच्या फिरकीनंतर रोहित शर्मा, शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले.

किवींने दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी आज कोणताही चूक केली नाही. रोहितने पहिल्या षटकापासूनच फटकेबाजीला सुरवात केली. त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये अर्धशतक नोंदवले. याच कामगिरीसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्वेंटी20 प्रकरात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र त्यानंतर लगेचच ईश सोढीने त्याला बाद केले. 

भारतीय संघ फलंदाजीमध्ये सध्या वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. पहिल्या सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर विजय शंकरला पाठविण्यात आले होते. ही जबाबदाकी आज रिषभ पंतकडे सोपविण्यात आली. त्यानेही ती अचूपणे पार पाडली. शिखर धवन बाद झाल्यावर त्याने गुरु महेंद्रसिंह धोनीच्या साथीत भारताला विजय मिळवून दिला. त्याने 28 चेंडूंमध्ये नाबाद 40 धावा केल्या तर धोनीने 17 चेंडूंमध्ये नाबाद 20 धावा केल्या. पंत आणि धोनी यांनी भारताला सात चेंडू राहिले असतानाच विजय मिळवून दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT