cricket 
क्रीडा

भारतीय गोलंदाजांनो आगोदर ग्राऊंडबद्दल जाणून घ्या; प्रशिक्षकांचे मत

सुनंदन लेले

ऑकलंड : न्यूझीलंडचा दौरा चालू झाल्यावर 15 दिवसांनंतर भारतीय संघाला पराभवाची कडू चव चाखायला मिळाली. हॅमिल्टन सामना यजमान संघाने जिंकल्याने तीन सामन्यांच्या मालिकेत चुरस निर्माण झाली आहे. टी-20 मालिका जिंकवण्यात गोलंदाजांचा हात होता. तसेच पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या पराभवात गोलंदाजांचा हात होता.

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात अपेक्षित गोलंदाजी केली नाही. 19 वाईड चेंडू भारतीय गोलंदाजांनी टाकले ज्याच्यावरून संघात पहिल्या सामन्यानंतर चर्चा झाली. भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांना भेटलो असताना त्यांनी मुद्दा मांडला की, ‘न्यूझीलंडमधे खेळताना गोलंदाजांना भूमिती समजणे गरजेचे आहे’.

भरत अरुण यांनी पहिल्या एक दिवसीय सामन्याबद्दल बोलताना महत्त्वाचे मुद्दे मांडले. ‘‘हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावरची सीमारेषा गोल असली तरी जवळ आहे. सामना खेळवला जात असताना जर अचूक मधली खेळपट्टी वापरली गेली तर दोनही बाजूंना समान अंतर राहते. जर खेळपट्टी किंचित हलवली तर मग गोलंदाजांच्या समस्या वाढतात कारण एका बाजूची सीमारेषा खूप जवळ होते. गोलंदाजाचा टप्पा किंवा दिशा थोडी चुकली तरी फलंदाज जवळची सीमारेषा सहजी पार करून 6 धावा खात्यात भसकन जमा करतात. भारताची फलंदाजी चालू असताना अशा जमा होणार्‍या 6 धावा गुदगुल्या करत असल्या तरी आपली गोलंदाजी चालू  झाली की त्याचा तोटा चांगलाच जाणवतो’’, भरत अरुण म्हणाले.

भरत अरुण भारतीय संघाचा सराव करताना गोलंदाजांना अचानक सीमारेषेजवळ नेऊन काही तरी समजावताना दिसले होते. ‘‘मी गोलंदाजांना सीमारेषेजवळ नेतो ते याच कारणासाठी की त्यांना मैदानाची भूमिती समजावी. कुठे सीमारेषा जवळ आहे कुठे लांब आहे हे मनात पक्के बसणे गरजेचे आहे. मग प्रयत्न हा करावा लागतो की असा मारा करायचा ज्याने फलंदाजाला मैदानाच्या सर्वात लांब सीमारेषेकडे फटके मारावे लागावेत. न्यूझीलंडमधील बरीचशी मैदाने छोट्या सीमारेषेची आहेत. पण ऑकलंडचे ईडन पार्क फारच विचित्र आहे. इथे व्यूहरचना लावताना कस लागतो. कॉम्प्यूटर विश्लेषकासोबत सगळ्याचा अभ्यास करून योजना आखणे इथपर्यंत आमचे काम असते मग सामन्यात त्याचे प्रतिबिंब मैदानावर उमटवणे संपूर्णपणे खेळाडूंच्या हाती असते’’, भरत अरुण समजावून देताना सांगत होते.

हॅमिल्टन सामन्यातील पराभवाने भारतीय संघाला कंबर कसून चांगला खेळ करायचे प्रोत्साहन लाभले आहे. यजमान न्यूझीलंड संघ कमजोर नक्कीच नाही. त्यांना पराभूत करायचे झाले तर संपूर्ण सामन्यात कसदार खेळ करणे हाच एकमेव उपाय आहे. ऑकलंडला होणार्‍या दुसर्‍या सामन्याचे महत्त्व त्याच अर्थाने वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT