क्रीडा

IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

विराज भागवत

IPL 2021 RCB vs KKR : सध्या सुरू असलेल्या IPLच्या हंगामात आज विराटच्या बंगळुरूचा मॉर्गनच्या कोलकाताशी सामना होणार होता. मात्र हा सामना रद्द करण्यात आला असून सामना आता पुढे ढकलण्यात आला आहे. आता बंगळुरू-कोलकाता सामना कधी खेळवला जाईल, हे IPL व्यवस्थापन लवकरच जाहीर करेल. हा सामना कदाचित काही दिवसांनी खेळवला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. सामना आज खेळवला जाणार नसल्याची माहिती 'पीटीआय'ने दिली आहे.

कोलकाता संघाचा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने कोलकाताच्या संघामध्ये काहीसं अस्वस्थ वातावरण आहे. वरूण आणि संदीप यांच्यासोबत असलेल्या इतर खेळाडूंना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कदाचित आजचा सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

IPL ही स्पर्धा बायो-बबलमध्ये खेळवली जाते. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव बायो-बबलमध्ये होणं ही खूपच धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. "कोलकाताचा वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर बंगळुरूच्या संघात काहीशी अस्वस्थता होती. त्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात येणार", असा अंदाज BCCI च्या अधिकाऱ्याने वर्तवला होता. त्यानुसार, अखेर आजचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कोलकाताचा पॅट कमिन्स याची प्रकृतीदेखील थोडी खराब असल्याची चर्चा आहे. कोलकाताचा शेवटचा सामना दिल्लीसोबत झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT