Indian Premier League esakal
IPL

BCCI चा मोठा निर्णय; IPL च्या अंतिम सामन्याच्या वेळेत बदल; 'हे' आहे कारण

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2022 चा (Indian Premier League) अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता हा सामना साडेसात ऐवजी रात्री आठ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. क्रिकबझच्या मते, आयपीएल समारोप समारंभामुळं अंतिम सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे.

सामना उशिरानं सुरु करण्याचं नेमकं कारण काय?

क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून (BCCI) आयपीएलमध्ये (IPL) पुन्हा एकदा ओपनिंग आणि क्लोजिंग शेरेमनी (उद्घाटन आणि समापन समारोह) आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. या हंगामात उद्घाटन समारंभाचं आयोजन करता आलं नाही. मात्र, यावेळी समापन समारोह आयोजित केला जाणार आहे. हा समारोहाची सुरुवात ६.३० वाजता सुरु होणार असून तो ५० मिनिटांचा असेल. समापन समारोह संपल्यानंतर नाणेफेक आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल. याच कारणामुळं आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशिरानं सुरु होणार आहे.

दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या प्लेऑफमध्ये लखनऊ आणि गुजरात या संघांनी आपलं स्थान पक्कं केलंय. आणखी दोन संघाची प्लेऑफमध्ये निवड झाल्यानंतर एकूण चार संघांमध्ये प्लेऑफचे सामने खेळवले जातील. त्यानंतर टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT