Indian Premier League
Indian Premier League esakal
IPL

BCCI चा मोठा निर्णय; IPL च्या अंतिम सामन्याच्या वेळेत बदल; 'हे' आहे कारण

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2022 चा (Indian Premier League) अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता हा सामना साडेसात ऐवजी रात्री आठ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. क्रिकबझच्या मते, आयपीएल समारोप समारंभामुळं अंतिम सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे.

सामना उशिरानं सुरु करण्याचं नेमकं कारण काय?

क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून (BCCI) आयपीएलमध्ये (IPL) पुन्हा एकदा ओपनिंग आणि क्लोजिंग शेरेमनी (उद्घाटन आणि समापन समारोह) आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. या हंगामात उद्घाटन समारंभाचं आयोजन करता आलं नाही. मात्र, यावेळी समापन समारोह आयोजित केला जाणार आहे. हा समारोहाची सुरुवात ६.३० वाजता सुरु होणार असून तो ५० मिनिटांचा असेल. समापन समारोह संपल्यानंतर नाणेफेक आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल. याच कारणामुळं आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशिरानं सुरु होणार आहे.

दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या प्लेऑफमध्ये लखनऊ आणि गुजरात या संघांनी आपलं स्थान पक्कं केलंय. आणखी दोन संघाची प्लेऑफमध्ये निवड झाल्यानंतर एकूण चार संघांमध्ये प्लेऑफचे सामने खेळवले जातील. त्यानंतर टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT