Indian Premier League esakal
IPL

BCCI चा मोठा निर्णय; IPL च्या अंतिम सामन्याच्या वेळेत बदल; 'हे' आहे कारण

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2022 चा (Indian Premier League) अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता हा सामना साडेसात ऐवजी रात्री आठ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. क्रिकबझच्या मते, आयपीएल समारोप समारंभामुळं अंतिम सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे.

सामना उशिरानं सुरु करण्याचं नेमकं कारण काय?

क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून (BCCI) आयपीएलमध्ये (IPL) पुन्हा एकदा ओपनिंग आणि क्लोजिंग शेरेमनी (उद्घाटन आणि समापन समारोह) आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. या हंगामात उद्घाटन समारंभाचं आयोजन करता आलं नाही. मात्र, यावेळी समापन समारोह आयोजित केला जाणार आहे. हा समारोहाची सुरुवात ६.३० वाजता सुरु होणार असून तो ५० मिनिटांचा असेल. समापन समारोह संपल्यानंतर नाणेफेक आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल. याच कारणामुळं आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशिरानं सुरु होणार आहे.

दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या प्लेऑफमध्ये लखनऊ आणि गुजरात या संघांनी आपलं स्थान पक्कं केलंय. आणखी दोन संघाची प्लेऑफमध्ये निवड झाल्यानंतर एकूण चार संघांमध्ये प्लेऑफचे सामने खेळवले जातील. त्यानंतर टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT