Gautam Gambhir  esakal
IPL

Gautam Gambhir : ...तर बीसीसीआयचा 'तो' सर्वात खराब निर्णय ठरला असता; गौतम गंभीर कशाबद्दल बोलतोय?

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir : इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम काही महिन्यात सुरू होत आहे. आयपीएलची सुरूवात 2008 मध्ये झाली होती. त्यानंतर आयपीएल प्रत्येक हंगामागणिक यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहत आहे. कमाईच्या बाबतीत देखील आयपीएल आपलेच रेकॉर्ड सातत्याने मोडत आहे.

आयपीएलमुळे देशांतर्गत क्रिकेटला देखील बळकटी मिळाली आहे. अनेक स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळत आहे. त्यामुळे भारताची पुढची पिढी तयार होण्यास मदत होते. दरम्यान, गौतम गंभीरने आयपीएल संदर्भात आपले मत व्यक्त केलं आहे.

स्पोट्सकीडाच्या यूट्यूब चॅलनवर गौतम गंभीरला एक प्रश्न विचारण्यात आला होता. गंभीरला विचारण्यात आलं की जर बीसीसीआयने आयपीएलची सुरूवातच केली नसती तर काय झालं असतं?

या प्रश्नाचं उत्तर देताना गंभीर म्हणाला, 'मला असं वाटतं की जर बीसीसीआयने आयपीएल सुरू केलं नसतं तर तो बीसीसीआयचा सर्वात खराब निर्णय असता.'

अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2024 चा हंगाम हा 22 मार्च ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत खेळला जाईल. आयपीएलचा हंगाम कधी सुरू होणार हे लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखेवर ठरणार आहे.

यंदाच्या 19 डिसेंबरला झालेल्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रूपयला खरेदी केलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT