RCB vs KKR sakal
IPL

IPL 2022 : नवी मुंबईत बंगळूर विरुद्ध कोलकाता; कोण मारणार बाजी

गतविजेत्यांना पराभवाचा धक्का देऊन यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा बंगळूर संघाशी सामना

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : गतविजेत्यांना पराभवाचा धक्का देऊन यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा बंगळूर संघाशी सामना होत आहे. बंगळूरने त्यांच्या पहिल्या सामन्यात काहीही चुकीचे केले नाही, तरी त्यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कडवी चुरस अपेक्षित आहे.

विराट कोहली कर्णधार नसलेल्या बंगळूरचा पहिल्या सामन्यात पराभव झाला असला, तरी त्यांनी २०४ ही भक्कम धावसंख्या उभारली होती. गतस्पर्धेत सर्वाधिक विकेट मिळवणारा हर्षल पटेल संघात असतानाही त्यांना या धावसंख्येचे संरक्षण करता आले नव्हते. गोलंदाजीतील छोटे-मोठे कमकुवत दोष दूर केले तर बंगळूरसाठी विजय दूर नसेल.

विराट कोहलीने सोडलेले नेतृत्व, एबी डिव्हिल्यर्सची निवृत्ती आणि ग्लेन मॅक्सवेलसारख्या खेळाडूची अनुपस्थिती, युझवेंद्र चहलसारखा अनुभवी फिरकी गोलंदाज संघात नसणे यामुळे बंगळूरचा संघ नव्याने तयार होत आहे. टीम म्हणून लय मिळवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार फाफ डुप्लेसीने जोरदार फलंदाजी करत ८८ धावांची खेळी केली. विराटनेही ४१ धवांचा तडाखा दिला होता. उद्या कोलकाता विरुद्धही मोठी धावसंख्या उभारायची असल्यास या दोघा अनुभवी फलंदाजांना सातत्य ठेवावे लागणार आहे.

वाईड चेंडूंनी केला होता घात

२०५ धावांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या बंगळूरच्या गोलंदाजांनी तब्बल २१ वाईड चेंडूंच्या धावा दिल्या होत्या. यातील सर्वाधिक १४ धावा महम्मद सिराजने दिल्या होत्या. एरवी अचुक गोलंदाजी करणाऱ्या हर्षल पटेलचेही टप्यावर नियंत्रण नव्हते. बंगळूरच्या सर्वच गोलंदाजांना अचुकतेवर भर द्यावा लागणार आहे. कोलकाता संघही नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळत असला आणि त्यांच्या संघातही काही बदल झालेले असले तरी सुनील नारायण, आंद्र रसेल, वरुण चक्रवर्ती, नितीश राणा हे खेळाडू कायम आहेत. उमेश यादवने यंदाच्या स्पर्धेचाच पहिला चेंडू नोबॉल टाकून सुरुवात केली असली, तरी २० धावांत २ बळी अशी कामगिरी करून तो सामन्यात सर्वोत्तम ठरला होता. एकूणच कोलकाता संघाला पहिल्याच सामन्यातून लय मिळाली आहे, त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्यांचे पारडे किंचित जड असेल.

आमने सामने

फाफ डुप्लेसी-विराट कोहली विरुद्ध उमेश यादव आणि सुनील नारायण यांच्यातले द्वंद सामन्यातील आकर्षण ठरणार आहे; तर श्रेयस अय्यर आणि आंद्र रसेल यांच्यासमोर हर्षल पटेल आणि हसरंगा यांचे आव्हान असेल.

नवी मुंबईत धावांचा पाऊस?

डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच सामन्यात ३९ षटकांत तब्बल ४१३ धावांचा पाऊस पडला होता. २०५ धावांचे लक्ष्य पार झाले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कोणतीही धावसंख्या पार केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT