IND vs SL Mohammed Siraj  esakal
क्रीडा

IND vs SL : सिराजने लंका पेटवली; गतविजेत्यांच्या नावावर खराब रेकॉर्डची झाली नोंद

अनिरुद्ध संकपाळ

India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेसाठी मोहम्मद सिराज डोकेदुखी ठरला. सिराजने घेतलेल्या 6 विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 50 धावात गुंडाळले. श्रीलंकेची ही वनडे क्रिकेटमधील भारताविरूद्धची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली.

जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात लंकेला पहिला धक्का दिला तर सिराजने चौथ्या षटकात 4 विकट्स घेत श्रीलंकेची अवस्था 4 षटकात 5 बाद 12 धावा अशी केली.

सिराजने श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाची शिकार करत आपला पाचवा बळी टिपला. त्यानंतर 17 धावा करणाऱ्या कुसल मेंडीसला देखील बाद करत लंकेला सातवा आणि मोठा धक्का दिला. मेंडीसच्या रूपाने सिराजने आपला सहावा बळी टिपला.

हार्दिक पांड्या आणि बमराहने श्रीलंकेची अवस्था 7 बाद 33 धावात केली. त्यानंतर हार्दिक पांड्याने दुनिथ वेल्लालागे (8), प्रमोद मदुशान (1) आणि मथिशा पथिराना (0) यांची विकेट घेत लंकेचा डाव 50 धावात गुंडाळला. आशिया कपच्या फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय येईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र भारताने लंकेला 50 धावात गुंडाळात सामना लवकर उरण्याची शक्कल लढवली आणि वरूण राजांना देखील मात देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT