राणी रामपाल 
क्रीडा

ऑलिंपिक पात्रता लढतीपूर्वी भारतीय हॉकी संघांची चाचणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय हॉकी संघ अद्याप पात्र ठरले नसले, तरी ऑलिंपिक हॉकी चाचणी स्पर्धेत त्यांचा सहभाग असेल. या चाचणी स्पर्धेद्वारे ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी तयार होण्याची संधी भारतीय संघांना मिळणार आहे. टोकियोतील चाचणी स्पर्धेसाठी भारतीय संघ आज रवाना झाले.

हॉकी इंडियाने पुरुष हॉकी संघातील नवोदित खेळाडूंची या स्पर्धेद्वारे चाचणी करण्याचे ठरवले आहे. या स्पर्धेतील भारताच्या प्रतिस्पर्धी संघांचे जागतिक मानांकन भारतापेक्षा कमी असल्याने हा निर्णय झाला आहे, मात्र त्याच वेळी महिला संघाच्या मानांकनापेक्षा सरस संघ असल्याने ताकदवान संघ पाठवण्यात आला आहे. महिला संघास या स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला कस आजमावता येणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत महत्त्वाची आहे. आम्ही या वर्षभरात जपान; तसेच चीनला हरवले; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. ही लढत जिंकलो तर आमच्या ऑलिंपिक लढतीच्या पूर्वतयारीस चांगलीच बळकटी येईल, असे भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने सांगितले.

पुरुषांच्या स्पर्धेत भारतास जपान, न्यूझीलंड आणि मलेशियाचे आव्हान असेल. "जपानमधील स्पर्धात नवोदितांसाठी चांगली संधी आहे. ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी संघ निवडताना ही कामगिरी नक्कीच लक्षात घेतली जाईल', असे भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सांगितले.

या स्पर्धेचा आम्हाला मुख्य ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळीही फायदा होईल. येथील वातावरण कसे असेल. मैदान कसे आहे, याचीही कल्पना येईल, असेही तो म्हणाला. ही चौरंगी स्पर्धा 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT