Ramiz Raja Statement About India Respect  esakal
क्रीडा

Ramiz Raja: 'टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळला नाही तर...', पीसीबीने भारताला दिली धमकी

पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी बीसीसीआयला दिला इशारा

Kiran Mahanavar

Pakistan Cricket Team : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी ऑक्टोबरमध्ये विधान केले होते. पुढील वर्षी आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानला जाऊ शकणार नाही. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवली जाऊ शकते. बीसीसीआयचे सचिव असण्यासोबतच जय शाह आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत, अशा परिस्थितीत त्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संतप्त झाले. जवळपास महिना उलटला तरी पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांनी या प्रकरणावर आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बीसीसीआयला धमकीसह आव्हान दिले आहे.

आशिया चषक खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास पाकिस्तान भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकेल, असे पाकिस्तानकडून यापूर्वीही सांगण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांनी या प्रकरणाला पुन्हा एकदा हवा दिली आहे. ते म्हणाले, "जर ते आशिया चषकासाठी पाकिस्तानात आले नाहीत तर ते आमच्याशिवाय पुढच्या वर्षी विश्वचषक खेळतील." याबाबत आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत.

पुढे बोलताना रमीझ राजा म्हणाले की, 'पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ खेळला नाही, तर बघूया कोण बघणार ही स्पर्धा. गेल्या वर्षी विश्वचषकात आम्ही भारताला हरवले होते. आशिया कपमध्येही आम्ही भारताचा पराभव केला. पाकिस्तानी संघाने बिलियन डॉलर इकॉनॉमी संघाचा दोनदा पराभव केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा म्हणाले, आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. आम्हाला पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आम्ही चांगले खेळू. टी-20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच वेळी, यापूर्वी आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT