PV Sindhu ANI
क्रीडा

सिंधूची मेडल जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली...

Tokyo Olympics: सिंधूची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली सिंधूने चीनच्या खेळाडून सहज धूळ चारत मिळवलं कांस्यपदक PV Sindhu wins Bronze in Tokyo Olympics Badminton read her first emotional reaction vjb 91

विराज भागवत

सिंधूने चीनच्या खेळाडून सहज धूळ चारत मिळवलं कांस्यपदक

Tokyo Olympics स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने कांस्यपदक पटकावले. तिने चीनच्या हे बिंगजिओ हिला २१-१३, २१-१५ अशा सरळ गेममध्ये धूळ चारली. सिंधूच्या विजयामुळे भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दुसरं पदक पटकावलं. तसेच, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन वेळा पदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. सिंधूने सामना जिंकल्यावर भावनिक प्रतिक्रिया दिली. (PV Sindhu wins Bronze in Tokyo Olympics Badminton read her first emotional reaction vjb 91)

"सध्या माझा आनंद गगनात मावत नाहीये. मी खूप वर्षांपासून प्रचंड मेहनत घेत आहे. मला असं वाटतं की आज मी छान खेळले. आताच्या क्षणाला माझ्या मनात अनेक भावना आहेत. कांस्यपदक मिळालं म्हणून मी खुश व्हावं की अंतिम फेरीत खेळता आलं नाही याचं मी दु:ख करावं हेच मला आता कळत नाहीये. माझ्या कुटुंबाने मला खूप सहाकार्य केलं. त्यांनी केलेल्या सहाकार्याबद्दल धन्यवाद. भारतीय चाहत्यांनीही माझ्यावर खूप प्रेम केलंय. त्यांचेही धन्यवाद. खेळताना मला खूप दडपण होतं पण मी शांत राहिले आणि माझा खेळ करत राहिले. मी सामन्यात आघाडीवर होते पण तरीही मी आरामात खेळत नव्हते. जिंकेपर्यंत मी माझा पूर्ण जोर लावला आणि पदक मिळवलं याचा मला आनंद आहे", अशी विजयानंतर सिंधूने पहिली प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT