Rahul Dravid Team India 
क्रीडा

Rahul Dravid : "हनिमून पिरियड संपला" राहुल द्रविडवर टीम इंडियाच्या माजी विकेटकिपरची टीका

भारतीय क्रिकेट संघाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. मात्र याआधी राहुल द्रविड नेतृत्वाखाली भारतीय संघासाठी आशिया कप मध्ये काही चांगली कामगिरी करता आली नाही.

Kiran Mahanavar

Rahul Dravid Team India : भारतीय क्रिकेट संघाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. मात्र याआधी आशिया कप मध्ये भारतीय संघासाठी काही चांगली राहिली नाही. सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर पडली. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यानंतर आशिया कप ही त्यांच्या प्रशिक्षक कार्यकाळातील पहिली मोठी स्पर्धा होती. यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला काही चांगली कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या माजी विकेटकिपर खेळाडू सबा करीमने द्रविडवर टीका केली आहे.

साबा करीम एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, राहुल द्रविडसाठी आता कोठे कठीण काळ सुरू झाला आहे. राहुल द्रविडला देखील माहित आहे की आता त्यांचा हनिमून पिरियड संपला आहे. तो परिपूर्ण संघ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आतापर्यंत तो असं करताना दिसला नाही.

साबा करिबने आपल्या वक्तव्यात राहुल द्रविड आपली कोचिंग कारकीर्द कशी यशस्वी करू शकतो हे देखील सांगितले. राहुल हा अतिशय हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आहे. त्याला माहीत आहे की जर त्याला आपले कोचिंग यशस्वी करायचे असेल तर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे हा एक पर्याय आहे. मी फक्त कसोटी जिंकण्याबद्दल बोलत नाही. राहुल द्रविड जेव्हा खेळाडू म्हणून खेळायचा तेव्हाही हे घडायचे. पण जर भारतीय संघाने या देशांमध्ये कसोटी मालिका जिंकली तर कुठेतरी राहुल द्रविड संघाच्या कामगिरीवर खूप खूश असेल.

ऑस्ट्रेलिया संघाला आता भारत दौऱ्यावर यायचे आहे. येथे 20 सप्टेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघही भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन दिवसांच्या अंतरानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यानंतर भारतीय संघाला ५ दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. यामध्ये टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा कारनामा, अपहरणात वडिलांचा सहभाग; गुन्ह्यातली कार घराबाहेर, आईने पोलीसांवर सोडले कुत्रे

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Asia Cup 2025: टीम इंडियाला पाकिस्तानचा 'अपमान' करण्याची पुन्हा संधी; 'या' तारखेला India vs Pakistan समोरासमोर येणार; जाणून घ्या कसं

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

SCROLL FOR NEXT