Ranji Trophy 2023
Ranji Trophy 2023 
क्रीडा

Ranji Trophy: नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्या डावातील ‘टाय’ दोघांच्याही मुळावर

सकाळ ऑनलाईन टीम

Ranji Trophy 2023 : ‘ब’ गटातून मुंबई की महाराष्ट्र, कोण गाठणार बाद फेरी, अशी सर्व उत्सुकता या लढतीवर एकवटलेली असताना रणजी क्रिकेटच्या इतिहासात अपवादानेच घडणारी घटना घडली. पहिल्या डावातील धावसंख्या समान झाली (टाय) त्यामुळे एका गुणावर समाधान मानण्याची वेळ आली; मात्र विझीग्राम येथील लढतीत आंध्र प्रदेशने अनपेक्षितपणे आसामवर डावाच्या विजयामुळे बोनस गुणाची कमाई केली, तीच त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळवून देणारी ठरली.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना इतिहासात नोंद करण्याइतका अनपेक्षित झाला. गेल्या दोन दिवसांच्या खेळात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. दोन्ही संघांचा डाव ३८४ धावांवर संपला. त्यानंतर आज महाराष्ट्राला २५२ धावांत रोखल्यानंतर मुंबईने २८ षटकांत हे आव्हान पार करण्याचे आव्हान स्वीकारले; परंतु २० षटकांत ६ बाद १५० धावांही केल्या; तरीही प्रयत्न अपुरे ठरणार, हे लक्षात आल्यावर सामना अनिर्णित सोडवण्यावर भर दिला.

शुक्रवारचा संघर्ष

बाद फेरी गाठायची तर आजच्या दिवशी निर्णायक विजयासाठी दोघांकडे पर्याय नव्हता. मुंबईने महाराष्ट्राची ६ बाद १०१ अशी अवस्था केली होती; परंतु अझिम काझी (७५) सौरभ नवले (४७) यांच्या फलंदाजीमुळे महाराष्ट्राने २५२ धावा उभारल्या. मुंबईसाठी हे आव्हान २७ षटकांत पार करणे आवश्यक होते. सरासरी ९ ते १० धावांच्या सरासरीने धावांचा पाठलागही सुरू केला. या दरम्यान विकेट गेल्या तरी लढा कायम ठेवला होता; परंतु २७.३ षटकांत ६ बाद १९५ धावा करता आल्या.

काय घडले....

आंध्रने बोनस गुणासह विजय मिळवल्यामुळे त्यांचे २६ गुण झाले. महाराष्ट्राचेही २६ गुण; तर मुंबईचे २४ गुण झाले. आंध्र आणि महाराष्ट्र यांचे समान गुण असल्याने साखळीत बोनस गुणासह किती विजय मिळवले याला प्राधान्य महाराष्ट्रच्या खात्यात एकही बोनस गुण नव्हता. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रही स्पर्धेबाहेर.

गुरुवारचे नाट्य...

  • महाराष्ट्रच्या ३८४ धावांसमोर मुंबईची सुरुवातीला ५ बाद १८७ अशी अवस्था

  • झुंझार फलंदाजी करणारा प्रसाद पवार १४५ धावावर बाद; तेव्हा मुंबईच्या ७ बाद ३०६ धावा

  • क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुंबईच्या तनुष कोटियनच्या बोटाला टाके; तरीही तो फलंदाजीस

  • मुंबईच्या आशा कमकुवत होत असताना कोटियनची झुंझार फलंदाजी आणि ९३ धावांची खेळी

  • मुंबईचा नववा फलंदाज बाद झाला; तेव्हा पहिल्या डावात आघाडीसाठी आणि त्यातून मिळणाऱ्या तीन गुणांसाठी १३ धावांची गरज

  • ३८४ ः ३८४ अशी समान गुणसंख्या असताना ओस्तवालच्या चेंडूवर कोटियन बाद त्यामुळे पहिल्या डावात टाय

  • एकीकडे ही चुरस रंगत असताना आंध्र प्रदेशने आसामवर डावाने विजय मिळवला. त्यामुळे त्यांना सात गुण मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT