| Ranji Trophy Vaibhav Suryavanshi News  
क्रीडा

Ranji Trophy : 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी रणजी संघातून बाहेर, 2 सामन्यांनंतरच का वगळले?

Kiran Mahanavar

मोईनुल हक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रणजी एलिट गटातील सामन्यात मुंबईविरुद्धचा पराभव आणि छत्तीसगडसोबतचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर बिहारचा संघ तिसरा सामना खेळण्यासाठी मेरठला पोहोचला आहे.

19 जानेवारीपासून बिहारची उत्तर प्रदेशशी सामना खेळणार आहे. यासाठी बीसीएने नवीन संघ जाहीर केला आहे. समस्तीपूरच्या वैभव सूर्यवंशी, जो मागील दोन सामन्यांचा भाग होता आणि लहान वयात पदार्पण करून चर्चेत होता, त्याला यावेळी संधी मिळाली नाही.

अर्थात रणजी संघातून वैभव सूर्यवंशीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. वैभव सूर्यवंशीसोबतच आकाश राजलाही रणजी संघामधून बाहेर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी निवड समितीने अभिजीत साकेत आणि मलय राज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या दोघांनाही फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर संघात स्थान देण्यात आले आहे.

तरुण वयात पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला गेल्या दोन सामन्यांमध्ये काही विशेष कामगिरी करता आली नाही. मुंबईविरुद्धच्या पहिल्या डावात 19 आणि दुसऱ्या डावात 12 धावा करून तो बाद झाला. त्याच वेळी, छत्तीसगडविरुद्ध तो दोन्ही डावात 0 धावांवर बाद झाला. त्याला संघातून वगळण्यामागे त्याची खराब कामगिरी हे क्रिकेट तज्ज्ञ सांगत आहेत.

वैभव सूर्यवंशीने वयाच्या 13 व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणापूर्वी त्याच्या नावावर एका वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये 49 शतके आणि 3 द्विशतके झळकावण्याचा विक्रम आहे. पण ही जादू रणजीमध्ये चालू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT