Babar Azam esakal
क्रीडा

Babar Azam : रवी शास्त्रींच्या त्या प्रश्नावर बाबर आझमची कळी खुलली; म्हणाला खूप छान

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam : भारतात उद्या (5 ऑक्टोबर) 13 वा वनडे वर्ल्डकप सुरू होत आहे. यापूर्वी सहभागी 10 संघांचे कर्णधार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कॅप्टन्स मीटसाठी एकत्र आले आहेत. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम देखील उपस्थितीत होता.

यावेळी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बाबर आझमला अनेक प्रश्न विचारले. मात्र त्यांच्या एका खास प्रश्नावर बाबर आझमची कळी खुलली. बाबर आझम आणि पाकिस्तान संघातील जवळपास सर्व खेळाडू भारतात पहिल्यांदाच खेळणार आहेत.

बाबर आझमला रवी शास्त्री यांनी विचारले की, बिर्याणी कशी होती. त्यावर बाबर आझमने हसत हैदराबादी बिर्याणी खूप छान होती असं उत्तर दिलं. भारतात इतक्या जोरदारपणे स्वागत होईल याची अपेक्षा नव्हती असं देखील बाबर म्हणाला.

बाबर सोबतच भारताचा कर्णधार रोहित शर्माला देखील या कार्यक्रमादरम्यान अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी रोहितने वनडे वर्ल्डकप खेळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते असे वक्तव्य केलं.

याचबरोबर रोहितला दोन वॉश ऑऊट झालेल्या सराव सामन्यांबद्दल देखील विचारण्यात आले. त्यावेळी तो आम्ही आनंदी आहोत की आम्हाला काही दिवस सुट्टी मिळाली. एकंदर आम्ही वर्ल्डकपची चांगली तयारी केली आहे. आम्ही एशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका खेळली आहे.

रोहितने यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्ही जीवचं रान करू असं देखील सांगितलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT