Ravi Shastri Criticize Team India 2nd Inning Batting Says Players Fear On Day 4 esakal
क्रीडा

ENG vs IND | टीम इंडियाचा घाबरून बचावात्मक पवित्रा : रवी शास्त्रींचा दावा

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यातील पाचव्या कसोटीत (5th Test) इंग्लंडने भारताचे 378 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच पार केले. इंग्लंडने गतवर्षीच्या कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला आणि मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रूटने (Joe Root) 142 धावांची दमदार खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावात देखील शतकी (104 आणि 114) खेळी करत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, भारताचे फलंदाज दुसऱ्या डावात घाबरले आणि त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला यामुळे इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले असे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केले.

भारताने पाचव्या कसोटीत पहिल्यांदा फलंदाजी करताना 416 धावा केल्या. त्यानंतर भारताने इंग्लंडला 284 धावात गुंडळत पहिल्या डावात 132 धावांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. त्यांना दुसऱ्या डावात 245 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून चेतेश्वर पुजारा (66) आणि ऋषभ पंत (57) या दोघांनाच अर्धशतकी खेळी करता आली.

दरम्यान, एजबेस्टन कसोटीचे स्काय स्पोर्ट्सवर कॉमेंटरी करणाऱ्या रवी शास्त्रींनी भारताने ज्या प्रकारे दुसऱ्या डावात फलंदाजी केली त्यावर टीका केली. ते म्हणाले, 'मला वाटते की हे निराशाजनक होते. आपण चांगली फलंदाजी करून इंग्लंडला सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नसती.'

ते पुढे म्हणाले की, 'भारतीय संघाने दोन सेशन फलंदाजी करणे गरजेचे होते. मला असे वाटते की ते चौथ्या दिवशी बचावात्मक पवित्र्यात गेले. ते चौथ्या दिवशी घाबरले होते. विशेषकरून उपहारानंतर. विकेट गेल्यानंतरही ते धोका पत्करून आक्रमक खेळू शकले असते. त्यावेळी सामन्यात धावा करणे खूप गरजेचे होते. मला असे वाटते की ते खूप बचावात्मक पवित्र्यात गेले. त्यांनी विकेट लवकर लवकर गमावले. यामुळे इंग्लंडला फलंदाजीसाठी बराच वेळ मिळाला.'

रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना गेल्या वर्षी भारताने इंग्लंडमधील कसोटी मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली होती. मात्र मालिकेतील पाचवा सामना हा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला होता. तो सामना 1 जुलैला बर्मिंगहममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा 7 विकेट्सनी पराभव करत इंग्लंडने मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT