Ravindra Jadeja on Kapil Dev 
क्रीडा

Ravindra Jadeja : 'तुमचा मुद्दा ठेवा पण संघात...' कपिल देवच्या वक्तव्यावर रवींद्र जडेजा संतापला

Kiran Mahanavar

Ravindra Jadeja on Kapil Dev : भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत टीम इंडियाच्या काही खेळाडूंवर अहंकारी असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाला होता की, काही खेळाडू पैशाच्या बाबतीत अहंकारी झाले आहेत. खेळाडूंना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे आणि सल्ला घेण्यासाठी ते अनुभवी व्यक्तीकडेही जात नाहीत.

यावर आता रवींद्र जडेजाने प्रत्युत्तर दिले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना जडेजा म्हणाला की, माजी खेळाडूंनी आपले मत व्यक्त केले पाहिजे, मात्र कपिलने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही.

कपिल देव यांच्या टोमणेला प्रत्युत्तर देताना जडेजा म्हणाला की, जेव्हा भारत सामना हरतो तेव्हा लोक अशा कमेंट येतात. माजी खेळाडू आपले म्हणणे ठेवू शकतात, पण मला वाटत नाही की या संघात काही अहंकार आहे. प्रत्येकजण आपापल्या क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि प्रत्येकजणी मेहनत करत आहे.

जडेजा पुढे म्हणाला की, युवा आणि अनुभव यांचा मेळ घालणारा हा चांगला संघ आहे. आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि हाच आमचा मुख्य उद्देश आहे, कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही. यापूर्वी कपिल म्हणाले होते की, मला विश्वास आहे की अनुभवी व्यक्ती मदत करू शकते. कधी कधी खूप पैसा आला की अहंकार येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल पुन्हा महागले! 8 जुलैचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

Pune: पालखी सोहळा मुक्कामाची तयारी पूर्ण; भवानी पेठ आणि नाना पेठेतील विठ्ठल मंदिरे सज्ज

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची बदलापूर ते मुंबई रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरु

Pune: तिसऱ्या दिवशीही रस्त्यांवर पाणी; महापालिकेची यंत्रणा अपयशी; वारकऱ्यांना अडचणींचा सामना

Aashadhi Wari: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनालाही वारकऱ्यांचा नम्र नकार! ‘वारी आळंदीतूनच’ म्हणत दोन लाख भाविक ठाम

SCROLL FOR NEXT