मुंबई : भारतीय क्रिकेट संघात कर्णधार विराट कोहलीसह सलामीवीर रोहित शर्मासुद्धा एक असा खेळाडू आहे जो सातत्याने क्रिकेट खेळत आहे. मात्र, त्याने अद्याप क्रिकेटमधून ब्रेक घेतलेला नाही. मात्र, आता त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडीजचा संघ पुढील महिन्यात तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. सहा डिसेंबरपासून भारत आणि विंडीजमधील ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होणार आहे. त्यानंतर 15 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेलासाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षात झालेल्या प्रत्येक मालिकेत रोहित शर्मा खेळलेला आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मधूनच विश्रांती घेतली होती. या मालिकेत रोहितने संघाचे नेतृत्त्व केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही तो खेळला. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व केले. त्यानंतर तो विश्वकरंडकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विश्वकरंडकानंतरही तो प्रत्येक मालिकेत खेळला आहे. त्यामुळेच आता त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.
त्याच्याजागी आता संघात कदाचित मयांक अगरवालला स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. मयांकने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणापासूनच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्याला एकदिवसीय संघातही स्थान मिळू शकते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.