Rohit Sharma News sakal
क्रीडा

Team India : 'रोहित शर्माकडून कर्णधारपद हिरावून या खेळाडूला करा' BCCIला माजी निवडकर्त्याची मागणी

Kiran Mahanavar

Rohit Sharma News: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी हुकली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया वाईट रीतीने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या या अपयशानंतर रोहित शर्माकडून कसोटी कर्णधारपद काढून घेण्याची मागणी होत आहे.

भारतीय संघाचे माजी निवडकर्ते देवांग गांधी यांनी बीसीसीआयकडे रोहित शर्माकडून कसोटी कर्णधारपद काढून दुस-या अनुभवी खेळाडूकडे सोपवण्याची मागणी केली आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्मासह 34 किंवा त्याहून अधिक वयाचे सहा सदस्य होते.

2019 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल सुरू झाल्यापासून भारताने प्रथम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि आता रोहितच्या नेतृत्वाखाली दोन्ही वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसह भारताने WTC चे पुढील चक्र सुरू करेल, त्यामुळे रोहितच्या दोन वर्षांच्या चक्रात भारताचे नेतृत्व करण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2025 WTC फायनल येईल तेव्हा तो 38 वर्षांचा असेल.

भारताचे माजी सलामीवीर आणि माजी निवडक देवांग गांधी यांना वाटते की, कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माशी त्याच्या भविष्याबद्दल बोले पाहिजे सध्याच्या निवड समितीची जबाबदारी आहे.

देवांग गांधी म्हणाले, 'रोहितच्या कसोटीत भारताचे कर्णधारपद चालू ठेवण्याबाबत निवडकर्त्यांनी आपसात चर्चा करावी. त्यामुळे दोन वर्षांनंतर रोहित कर्णधार म्हणून संघाचा भाग असेल की नाही, मला माहीत नाही. त्यांनी रोहितशी बोलून भारतीय संघाला कसे पुढे जायचे आहे याचा मार्ग ठरवावा लागेल.

रोहितने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतून भारताच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून संघाने 10 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी सातमध्ये विजय, एक अनिर्णित आणि दोन पराभवांचा विक्रम नोंदवला आहे. तसेच या कालावधीत रोहितने तीन सामने खेळले नाहीत. एक कोविड-19 मुळे इंग्लंडविरुद्ध आणि डाव्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले नाहीत.

माजी निवडकर्ता देवांग गांधी म्हणाले, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर ही एक अंतरिम गोष्ट असू शकते. कारण योगायोगाने जर रोहित संघाचे नेतृत्व करणार नसेल तर संघाचे नेतृत्व कोण करणार आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियात अविस्मरणीय 2-1 बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकताना भारताचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेसारख्या व्यक्तीकडे भारताचे नेतृत्व दिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT