Sanju Samson Replaced KL Rahul For 5 T20I Match Series Against West Indies esakal
क्रीडा

WI vs IND : टी 20 मालिकेसाठी केएल राहुलच्या जागी संजू सॅमसनची वर्णी

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारतीय निवडसमितीने वेस्ट इंडीज विरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या (West Indies Vs India T20I Series) मालिकेसाठी दुखापतग्रस्त केएल राहुलच्या (KL Rahul) जागी विकेटकिपर संजू सॅमसन (Sanju Samson) याची निवड केली आहे. संघाची घोषणा झाली त्यावेळी संघात केएल राहुलचा देखील समावेश करण्यात आला होता. मात्र त्याच्या नावसमोर स्टार होता. कारण जर तो दौऱ्याच्या सुरूवातीपर्यंत फिट झाला तरच त्याचा संघात समावेश करण्यात येणार होता.

मात्र बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत असतानाच गेल्या आठवड्यात केएल राहुलला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. केएल राहुलच्या जागी येणारा संजू सॅमसन विंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेत खेळला होता. ही मालिका भारताने 3 - 0 अशी जिंकली होती.

भारताचा 5 टी 20 सामन्यासाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटले, अर्शदीप सिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT