क्रीडा

राष्ट्रकुल स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व

वृत्तसंस्था

मुंबई/ पुणे - भारताच्या कुस्तीगिरांनी दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल अजिंक्‍यपद स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखले. सुशील कुमार, साक्षी मलिक या अनुभवी मल्लांचे सुवर्ण लक्षवेधक ठरत असले, तरी त्यापेक्षा भारतीयांची सांघिक कामगिरी त्याहून लक्षवेधक ठरली आहे. भारताने या स्पर्धेत एकूण २९ सुवर्ण, २४ रौप्य आणि ६ ब्राँझ अशी एकूण ५९ पदके पटकावली. 

सुशीलने २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतरचे त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय यश आहे. त्याने त्याच वेळी राष्ट्रीय विजेतेपदावर आपला हक्क होता हे दाखवताना परवीन राणाचे कडवे आव्हान ५-४ असे परतवले. त्याच राणाने आंतररेल्वे चाचणी स्पर्धेत सुशीलविरुद्ध खेळणे टाळले होते; तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुशीलच्या पायाला हात लावून माघार घेत असल्याचे सांगितले होते. त्या वेळी सुशील हा आदर्श आहे, त्याच्याविरुद्ध कसे खेळणार, असे राणा म्हणाला होता; मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत तो सुशीलविरुद्धची लढत खेळला. एवढेच नाही, तर बडे भाईसाबला लढतही दिली. अर्थात, परवीनला ब्राँझपदकाचे समाधान लाभले. सुशीलने निर्णायक साखळी लढतीत न्यूझीलंडच्या आकाश खुल्लर याला पिनफॉल करीत सुवर्णपदक निश्‍चित केले.

भारताची पहिली ऑलिंपिक पदक विजेती महिला कुस्तीगीर साक्षी मलिक हिनेही सुवर्णपदकाची कमाई केली. तिने अंतिम लढतीत न्यूझीलंडच्या तायला तुहाहिन फोर्ड हिला ६२ किलो वजनी गटात १३-२ असे पराभूत केले. 

उत्कर्षला सुवर्ण
स्पर्धेच्या रचनेनुसार गटातील प्रत्येक मल्ल प्रत्येकाशी लढल्यानंतर सर्वांगीण कामगिरीवर सुवर्णपदकाचा निर्णय होणार होता. यामध्ये फ्री-स्टाइलच्या ५७ किलो वजनी गटात पुण्याचा उत्कर्ष काळे याने सुवर्णपदकाची कमाई केली. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने प्रथम कॅनडाच्या दर्थ कॅपलॉन याचा ९-४, नंतर पाकिस्तानच्या महंमद बिलालचा १०-२ असा पराभव केला आणि गटात विजेते ठरताना अखेरच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या जॉन लॉरिस याला चीतपट केले. पुण्याच्याच राहुल आवारेचीदेखील कामगिरी दमदार होती. मात्र, अखेरच्या लढतीत त्याला भारताच्याच श्रावणकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाच्या पीर्स पाम आणि पाकिस्तानच्या अब्दुल वहाब याच्यावर (१०-०) असा तांत्रिक विजय मिळविला.

सर्व पदके भारताचीच
ग्रीको रोमन प्रकारात भारताचे तर एकतर्फी वर्चस्व होते. या प्रकारात भारताने सर्वच्या सर्व म्हणजे १० सुवर्ण आणि १० रौप्यपदके पटकावली. फ्री-स्टाइल प्रकारातही दहा सुवर्णपदके भारतीय मल्लांनीच पटकावली. या प्रकारात भारताला ७ रौप्य आणि दोन ब्राँझपदके मिळाली. महिलांमध्ये भारताने ९ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ ब्राँझपदके मिळविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT