Gautam Gambhir 
क्रीडा

"भारताला UAEतील T20 वर्ल्डकपचा पाकिस्तानपेक्षाही अधिक फायदा"

विराज भागवत

गौतम गंभीरने यामागचं कारणही सांगितलं

T20 World Cup 2021 in UAE: भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. पण दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेत १-० ची आघाडी घेतली. आता मालिकेतील ३ कसोटी सामने शिल्लक आहेत. त्यानंतर भारतीय खेळाडू IPL 2021 स्पर्धेसाठी युएईत दाखल होणार आहेत आणि पुढे तेथेच T20 वर्ल्डकपदेखील खेळला जाणार आहे. पाकिस्तानचा संघ युएईमध्ये गेले कित्येक वर्षे क्रिकेट सामने खेळत आहेत. पण तरीदेखील युएईतील T20 वर्ल्ड कपचा अधिक फायदा भारतीय संघाला होईल, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले. तसेच, त्यामागचे कारणही त्याने सांगितले.

"कोणता संघ वरचढ ठरेल ते टी२० क्रिकेटमध्ये सांगणं कठीण आहे. पण काही लोक म्हणत आहेत की पाकिस्तानने युएईमध्ये खूप क्रिकेट खेळलं आहे. असं असलं तरीही भारताला युएईतील टी२० वर्ल्डकपचा फायदा जास्त होईल. कारण भारतीय खेळाडू युएईमध्ये आधी महिनाभर IPL खेळणार आहेत. जेव्हा टी२० वर्ल्डकपच्या आधी तुम्ही त्याच मैदानांवर IPL सामने खेळता तेव्हा तुम्हाला वर्ल्डकपच्या तयारीसाठी खूपच चांगला वेळ मिळतो. उभय देशांमधील मालिका खेळून जेवढी तयारी होते त्यापेक्षा जास्त तयारी IPL मधील सामने खेळून होते. त्यामुळे भारतालाच याचा जास्त फायदा होईल", असं स्पष्ट मत गंभीरने व्यक्त केले.

Team-India

"IPL स्पर्धेचा दर्जा हा कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या तोडीस तोड असतात. किंबहुना IPL मधील क्रिकेटचा दर्जा थोडासा वरचा असतो असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. तुम्हीच विचार करा की वर्ल्ड कपच्या आधी तुम्ही दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेविरूद्ध एखादी मालिका खेळलात आणि त्याची तुलना तुम्ही IPL शी केलीत, तर नक्कीच IPLमध्ये तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीची तयारी करता येते कारण तेथे विविध देशांचे खेळाडू तुमच्यासोबत खेळत असतात. अशा परिस्थितीत पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा भारतीय संघाला युएईतील T20 World Cup चा जास्त फायदा होईल", असं म्हणत त्याने आपलं म्हणणं पटवू दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT