team india bcci plan no players over 30 years age in next t20 world cup cricket news sakal
क्रीडा

वय ठरवणार टीम इंडिया मधील एंट्री; पुढील वर्ल्ड कपपूर्वी BCCIचा मोठा प्लॅन ?

रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या खेळाडूंसाठी दरवाजे बंद ?

सकाळ ऑनलाईन टीम

Team India : ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर आता बदलाची मागणी होत आहे. टीम इंडिया वर्षभरात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकातून रिकाम्या हाताने परतली आहे. अशा परिस्थितीत संघातील अनेक खेळाडूंची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द धोक्यात आली आहे. पुढील टी-20 विश्वचषक मध्ये खेळणे त्यांच्यासाठी जवळपास अशक्य आहे. साहजिकच बदल होतील. हे कसे आणि कधी होणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. दरम्यान असा संकेत मिळाला आहेत की रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या खेळाडूंसाठी दरवाजे बंद होतील.

दोन वर्षांनंतर म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आतापासून टीम इंडियाला तयार करण्यासाठी काम करणार आहे. खेळाडूंची निवड हा या योजनेचा एक भाग आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आगामी काळात टी-20 फॉरमॅटमध्ये 30 वयापेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंना संघात स्थान दिले जाणार नाही.

एका स्पोर्ट्स वेबसाइटच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, बीसीसीआय पुढील टी-20 विश्वचषकासाठी संघ तयारीत कठोर निर्णय घेणार आहे, ज्यामध्ये युवा खेळाडूंना आजमावण्यावर भर दिला जाईल. या अंतर्गत आता 30 वर्षांवरील खेळाडूंना टी-20 संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या या वृत्तानुसार, बोर्ड पुढील वर्षी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याने खेळाडूंवर कामाचा भार नियंत्रित करण्यातही मदत होईल यावर बोर्ड विचार करत आहे. मात्र, वयाच्या कल्पनेवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT