ICC Ranking esakal
क्रीडा

ICC Ranking : भारताने कांगारूंना मात देत रचला इतिहास; तीनही फॉरमॅटमध्ये एक नंबर!

अनिरुद्ध संकपाळ

ICC Ranking : भारताने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्स राखून पराभव करत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारत हा आता कसोटी आणि टी 20 पाठोपाठ वनडेमध्ये देखील नंबर वन ठरला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा आता आशिया मधील पहिला संघ ठरला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचे 277 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाला खाली खेचत वनडे टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले.

भारतीय संघाने 42 सामन्यात 4864 पॉईंट्स अन् 116 रेटिंग पॉईंट्स मिळवत अव्वल स्थान गाठले. भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ही अव्वल स्थानाची रस्सीखेच भारताने अवघ्या 1 गुणाने सध्या तरी जिंकली आहे. पाकिस्तानचे 29 सामन्यात 3231 पॉईंट्स आणि 115 रेटिंग पॉईंट्स आहेत. ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

भारताने कसोटी आणि टी 20 मध्ये देखील टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेबाबत बोलायचं झालं तर भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना हा 24 सप्टेंबरला इंदौर येथे होणार आहे. मालिकेतील तिसरा सामना हा 27 सप्टेंबरला राजकोट येथे होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT