Team India  
क्रीडा

Team India : टीम इंडियाच्या राजकारणाचे बळी बनले 'हे' दोन खेळाडू

भारतीय क्रिकेट संघासाठी खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते, परंतु असे काही भाग्यवान खेळाडू आहेत जे आपल्या देशासाठी दीर्घकाळ खेळू शकतात.

Kiran Mahanavar

Team India : भारतीय क्रिकेट संघासाठी खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते, परंतु असे काही भाग्यवान खेळाडू आहेत जे आपल्या देशासाठी दीर्घकाळ खेळू शकतात. आपल्या कारकिर्दीत टीम इंडियामध्ये राजकारणाचे बळी ठरलेले दोन भारतीय क्रिकेटपटू आहेत. हे खेळाडू जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकले नाहीत.

Ambati Rayudu

भारताचा सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू हा टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार होता. 2019 च्या विश्वचषकात अचानक या खेळाडूला निवडकर्त्यांनी संघातून बाहेर फेकले. यानंतर अंबाती रायडूने या निर्णयाचा निषेध करत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ICC विश्वचषक 2019 दरम्यान अंबाती रायडूच्या जागी विजय शंकरचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता.

Karun Nair

भारतीय संघाचा फलंदाज करुण नायरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्रिशतक झळकावले होते. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग वगळता कोणत्याही भारतीय फलंदाजाला असा विक्रम करता आला नव्हता. या त्रिशतकानंतरच करुण नायरच्या कारकिर्दीची उलटी गिनती सुरू झाली. करुण नायर शेवटचा 2017 मध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसला होता. करुण नायरने भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर मोठे आरोप केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT