Team India
Team India  
क्रीडा

Team India : टीम इंडियाच्या राजकारणाचे बळी बनले 'हे' दोन खेळाडू

Kiran Mahanavar

Team India : भारतीय क्रिकेट संघासाठी खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते, परंतु असे काही भाग्यवान खेळाडू आहेत जे आपल्या देशासाठी दीर्घकाळ खेळू शकतात. आपल्या कारकिर्दीत टीम इंडियामध्ये राजकारणाचे बळी ठरलेले दोन भारतीय क्रिकेटपटू आहेत. हे खेळाडू जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकले नाहीत.

Ambati Rayudu

भारताचा सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू हा टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार होता. 2019 च्या विश्वचषकात अचानक या खेळाडूला निवडकर्त्यांनी संघातून बाहेर फेकले. यानंतर अंबाती रायडूने या निर्णयाचा निषेध करत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ICC विश्वचषक 2019 दरम्यान अंबाती रायडूच्या जागी विजय शंकरचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता.

Karun Nair

भारतीय संघाचा फलंदाज करुण नायरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्रिशतक झळकावले होते. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग वगळता कोणत्याही भारतीय फलंदाजाला असा विक्रम करता आला नव्हता. या त्रिशतकानंतरच करुण नायरच्या कारकिर्दीची उलटी गिनती सुरू झाली. करुण नायर शेवटचा 2017 मध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसला होता. करुण नायरने भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर मोठे आरोप केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : दोन हेवी वेट संघ भिडणार, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

SCROLL FOR NEXT