Virat-Kohli
Virat-Kohli 
क्रीडा

वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरीनंतर विराटच्या कुटुंबाला धमक्या; इंझमाम म्हणतो...

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : T-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमच्या खराब कामगिरीमुळं सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव झाला. त्यानंतर न्यूझीलंडविरोधातील दुसरा सामनाही भारतानं गमावला. त्यामुळं संतप्त झालेल्या क्रिकेटप्रमींनी कर्णधार विराट कोहलीच्या कुटुंबियांना धमक्या दिल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार कानावर आल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यानं प्रतिक्रिया दिली आहे.

इंझमामनं आपल्या युट्यूब चॅनेलवर विराटच्या कुटुंबियांना आलेल्या धमक्यांचा उल्लेख करताना ही बाब खेदजनक असल्याचं म्हटलं आहे. इंझमामनं म्हटलं, "मी टीव्हीवर ऐकलं की, विराट कोहलीच्या मुलीला धमक्या दिल्या गेल्या. हा खेळ आहे याला खेळासारखंच पाहा. तुम्हाला जर विराट कोहलीची कामगिरी आवडली नसेल तर त्यावर तुम्ही बोला पण त्याच्या कुटुंबाबाबत तुम्ही बोलायला नको. हा धमक्यांचा प्रकार ऐकून मला खुपच दुःख वाटलं"

दबावामुळं झाला टीम इंडियाचा पराभव - इंझमाम

इंझमाम पुढे म्हणाला, "भारतानं आज ज्या प्रकारे खेळ केला असा खेळ मी कधीही पाहिला नाही. भारतीय खेळाडूंनी खूपच जास्त दबावात खेळले. पाकिस्तानबरोबर हारल्यानंतर ते पुन्हा कमबॅक करु शकले नाहीत. फलंदाज तर एकेरी धावही घेऊ शकत नव्हते. या खऱाब कामगिरीमुळं भारतावर इतकी जास्त टीका केली जात आहे की, ते आज खेळू शकत नाहीएत. विराट कोहली तर फिरकीवर एकेरी धावही घेऊ शकत नव्हता. गोलंदाजीतही भारतीय टीम कुठेच दिसली नाही. तसंच फलंदाजीचा क्रमही बदलण्यात आला. त्यामुळं आजचा खेळ पाहून निराश झालो.

दरम्यान, T-20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदा पाकिस्तानकडून १० विकेटनं हार पत्करावी लागली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला ८ विकेटनं मोठा पराभव केला. टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ २० षटकांत सात बळी देऊन केवळ ११० धावाच करु शकला. त्यानंतर न्यूझीलंडनं भारतीय संघाला १४.३ षटक ८ गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर भारताची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा खूपच कमी राहिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT