A tie is enough for India to reach final of Champions Trophy  
क्रीडा

हॉकी : 'फायनल'साठी भारताला बरोबरी पुरेशी

वृत्तसंस्था

ब्रेडाः चॅम्पियन्स करंडकात शनिवारी होणाऱ्या भारत विरुद्ध नेदरलॅंड या सामन्यात भारताने जरी नेदरलॅंडला बरोबरीत रोखले तरी भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित आहे. मात्र नेदरलॅंडला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उद्याच्या सामन्यात विजय आवश्यक आहे.   

दोन विजय, एक पराभव आणि एक बरोबरी यांमुळे सात गुणांसह भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. माजी विजेते ऑस्ट्रेलिया दहा गुणांसह पहिल्या स्थानावर असून त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित आहे. सहा संघाच्या मालिकेच्या नियमांनुसार पहिले दोन संघ अंतिम फेरीत जातात. जर भारत नेदरलॅंड विरुद्ध सामना जिंकला तर 2016 मधील चॅम्पियन्स करंडकाची पुनरावृत्ती होईल. 

भारतीय संघाचे मुख्य मार्गदर्शक हरिंदर सिंग यांच्या मार्गदर्शकतेखाली भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवला तर अर्जेंटिनाला 2-1 असे पराभूत केले. रमनदिप सिंगला जरी दुखापत झालेली असली तरी संघातील सर्व स्ट्रायकरचा चांगला फॉर्म भारतीय संघासाठी उपयोगी पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT