क्रीडा

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना ; विराट कोहली आकर्षण

ही लढत जिंकून मालिका खिशात टाकणे भारतीय संघासाठी कठीण नसेल; परंतु संघातील नवोदित खेळाडू आपला स्तर कसा उंचावताहेत,

सकाळ वृत्तसेवा

इंदूर : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या होत आहे. ही लढत जिंकून मालिका खिशात टाकणे भारतीय संघासाठी कठीण नसेल; परंतु संघातील नवोदित खेळाडू आपला स्तर कसा उंचावताहेत, हे महत्त्वाचे ठरणार आहे. विराट कोहली या सामन्यात खेळणार असल्यामुळे तो या सामन्याचे आकर्षण असेल.

अफगाणिस्तानचा संघ टी-२० प्रकारात कितीही धोकादायक असला, तरी भारताला हरवणे त्यांच्यासाठी सोपे नसेल. यातच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामुळे भारताची फलंदाजी भक्कम आहे. मात्र टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या वाटेवर असलेल्या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. अष्टपैलू गुणवत्ता असलेल्या शिवम दुबेने फलंदाजीतील आपली क्षमता पहिल्या सामन्यातून दाखवून दिली आहे. आता गोलंदाजीत त्याला तेवढाच प्रभाव पाडावा लागणार आहे; तर एकहाती सामना जिंकून देण्याची ताकद असलेल्या रिंकू सिंगला आता अनुभवात समृद्ध व्हायचे आहे.

यष्टिरक्षक फलंदाज म्हणून जितेश शर्माकडे आशेने पाहिले जात आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी त्याने प्रत्येक वेळी प्रयत्न केलेला आहे. अफगाणिस्तानविरुद्धचे हे दोन सामने आणि त्यानंतर आयपीएल आणि त्याच वेळी टी-२० विश्वककरंडक स्पर्धेसाठी संघ निवड केली जाणार आहे. परिणामी जितेशसाठी ही आणखी एक संधी असेल. विश्वकरंडक स्पर्धेत जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि सिराज यांचे स्थान पक्के असेल.

अशा स्थितीत आपलाही विचार व्हायचा असेल, तर अर्शदीप, मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजांना अधिकाधिक प्रभावी मारा करायला लागणार आहे. मुकेश कुमारने आता कसोटी संघातही स्थान मिळवण्या इतका निवड समितीचा विश्वास मिळवला आहे. पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट मिळवल्या होत्या; परंतु चार षटकांत ३३ धावा दिल्या होत्या. विकेट मिळवण्याबरोबर धावा कमी देण्यासाठी अधिक अचूकता आणणे गरजेचे असणार आहे.फिरकी गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई हे भारताचे पुढचे आशास्थान असले, तरी निवड समितीचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनाही तेवढेच प्रयत्न करावे लागणार आहे.

तिलक वर्माऐवजी विराट?

युवराज सिंगसारखी प्रतिभा निर्माण करण्याची क्षमता असलेल्या तिलक वर्माला अजून आपले स्थान म्हणावे तसे पक्के करता आलेले नाही. त्यातच उद्याच्या सामन्यात विराट कोहलीसाठी त्याला जागा रिकामी करावी लागण्याची शक्यता अधिक आहे. पहिल्या सामन्यातून वैयक्तिक कारणासाठी माघार घेणारा विराट आता उर्वरित दोन सामने खेळण्यास सज्ज झाला आहे.

रोहितलाही मिळवायचाय फॉर्म

पहिल्या सामन्यात शुभमन गिलसह ताळमेळ न झाल्यामुळे धावचीत होण्याची वेळ आलेल्या रोहित शर्माला फॉर्म मिळवायचाय. त्यामुळे तोही विराटप्रमाणे आपला प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्नशील असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Year: पार्टी ऑल नाईट! महाराष्ट्रात हॉटेल्स-पब पहाटे ५ वाजेपर्यंत खुले राहणार; फक्त एकच अट, पण कोणती?

Confirm Ticket : रेल्वेने बदलला मोठा नियम! कन्फर्म सीट हवी असल्यास आत्ताच करून घ्या 'हे' एक काम..नाहीतर 30 जानेवारीनंतर बसेल फटका

Omraje Nimbalkar यांच्यावर आमदार पुत्राची जहरी टीका, 'शेंबड पोरं' म्हणत पुन्हा डिवचलं | Malhar Patil | Sakal News

थर्टी फर्स्टला हुल्लडबाजांवर पोलिसांची करडी नजर, मुंबई-पुण्यात वाहतुकीत बदल; कोणता रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Pachod News : कुटुंब नियोजनातही पुरुषांची मक्तेदारी; जबाबदारी मात्र महिलांवरच!

SCROLL FOR NEXT