Virat Kohli Urges Test Openers To Make Chance Count Against West Indies
Virat Kohli Urges Test Openers To Make Chance Count Against West Indies 
क्रीडा

INDvsWI : मयांक-राहुल फक्त आता खेळा, मग कोणाचीच गरज नाही आपल्याला!

वृत्तसंस्था

गयाना : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेत सलामीवीर लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांना मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा सल्ला कर्णधार विराट कोहलीने दिला आहे. 

मयांक आणि राहुल यांना कोणताच बॅकअप न घेण्याचा मोठा निर्णय कोहलीने घेतला आहे. ''सलामीवीरांच्या समीकरणामध्ये आम्ही फक्त दोन सलामीवीर निवडले आहेत. या मागे चारही डावांत त्यांना पुरेपूर खेळता यावे असा विचार आहे. मयांकने खूप चांगली कामगिरी आहे, राहुलनेसुद्धा यापूर्वी चांगली फलंदाजी केली आहे त्यामुळे आता त्याला कसोटी क्रिकेटमधील त्याचे स्थान पक्के करायचे आहे,'' असा विश्वास कोहलीने व्यक्त केला. 

जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या मोहिमेला भारतीय संघ उद्यापासून सुरवात करेल. यजमान विंडीजविरुद्ध भारत हा सामना खेळणार असून, कसोटी क्रिकेटच्या आव्हानाचा सामोरे जाताना अचूक संघ नियोजन आणि विजयाचा श्रीगणेशा हाच विचार भारतीय संघाने केला असेल, यात शंका नाही. 

सर रिचर्डस मैदानाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना साजेशी अशी तयार करण्यात आली असून, उसळणाऱ्या चेंडूंसमोर भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे अशी भारतीय फलंदाजी वरकरणी ताकदवान दिसत असली, तरी त्यांना ही ताकद मैदानावर दाखवावी लागणार आहे. अशाच खेळपट्टयांवर इंग्लंडला येथे 1-2 अशी मालिका गमवावी लागली होती हे भारतीय संघाला विसरून चालणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT