World Cup 2023 
क्रीडा

World Cup 2023: भारत वर्ल्डकप जिंकणार का? युवराज सिंगच्या वक्तव्यामुळे रोहित सेनेचे वाढले टेन्शन

युवराज सिंगने केले मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

ODI World Cup 2023 : टीम इंडियाने 2013 मध्ये शेवटचा विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून भारतीय संघाने जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे, पण बाद फेरीचे सामने येताच संघाची कामगिरी ढासळते आणि सामना हाताबाहेर जातो.

पण यावेळी 2023 चा विश्वचषक भारताला मिळणार आहे आणि चाहते आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, आता युवराज सिंगने टीम इंडियाची कमकुवतपणा सांगितली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावू शकते.

एका मुलाखतीत जेव्हा त्याला भारताच्या 2023 च्या विश्वचषकाच्या संभाव्यतेबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचे तर मला खात्री नाही की ते विश्वचषक जिंकतील की नाही. मी देशभक्त म्हणून म्हणू शकतो की भारत जिंकेल, पण संघाच्या मधल्या फळीत दुखापतींमुळे चिंता आहे. युवराज म्हणाला, 'त्यांना (भारत) विश्वचषक जिंकता येत नाही हे पाहणे निराशाजनक आहे, पण तेच आहे.'

संघाच्या संयोजनाबाबत युवी म्हणाला, आमच्याकडे एक समझदार कर्णधार रोहित शर्मा आहे. त्यांना टीम कॉम्बिनेशन बरोबर करता आले पाहिजे. आपल्याकडे किमान 20 खेळाडूंचा एक पूल असावा ज्यामधून सर्वोत्तम 15 संघात येतात. टॉप ऑर्डर ठीक आहे पण मिडल ऑर्डर अडचणीत आहे. क्रमांक 4 आणि 5 खूप महत्वाचे आहेत. जर ऋषभ पंत आयपीएल फ्रँचायझीसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असेल तर त्याने राष्ट्रीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे, परंतु तो कदाचित फिट नसेल.

सर्वोत्तम क्रमांक 4 बद्दल विचारले असता युवराजने केएल राहुलचे नाव सुचवले. रिंकू सिंगचेही नाव घेतले. युवराज म्हणाला- रिंकू सिंग खरोखरच चांगली फलंदाजी करत आहे. मला वाटते की त्याच्याकडे सामना तयार करण्याची आणि स्ट्राइक राखण्याची समज आहे. जर तुम्हाला ते हवे असतील तर तुम्हाला त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी द्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईत, कसं असेल मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं स्वरुप? वाचा...

Pune News : 'तो' तरुण सिंहगडावरुन बेपत्ता झालाच नाही, प्रकरणाला वेगळं वळणं ; नेमकं काय घडलं?

Sanju Samsonचे ट्वेंटी-२०त वेगवान शतक; आता Asia Cup मध्ये त्याला सलामीला खेळवायचं की नाही, हे निवड समितीनं ठरवायचं...

Latest Marathi News Updates : फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Adani Group: एका वर्षात अदानी समूहाचे कर्ज 20 टक्के वाढले; सरकारी बँकांनी किती कोटी दिले?

SCROLL FOR NEXT