IND vs NZ Twitter
क्रीडा

WTC INDvsNZ : वातावरणाची 'कसोटी'; चौथा दिवसही पावसाचा

सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या दिवसाचा संपूर्ण खेळ देखील पावासामुळे वाया गेला. त्यामुळे आता पाचवा आणि राखीव स्वरुपातील एक दिवस मिळून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. या दोन दिवसात सामन्याचा निकाल लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाचा खेळ असाच सुरु राहिला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या वहिल्या फायनलमध्ये आपल्याला भारत-न्यूझीलंड संयुक्तपणे जेतेपद मिळवताना पाहायला मिळेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यातील पहिला दिवस संपूर्णपणे पावसाने गाजवला. दुसऱ्या दिवशी अंधूक प्रकाशामुळे वेळेआधीच खेळ थांबला. दुसऱ्या दिवशी केवळ 64.4 षटकांचा खेळ झाला. रविवारी तिसऱ्या दिवशी वातावरणाने बऱ्यापैकी साथ दिली. पण 76.3 षटकानंतर खेळ थांबवण्यात आला. चौथ्या दिवशीचा अख्खा दिवस वाया गेला. त्यामुळे आता उरलेल्या दोन दिवसांत सामन्याचा निकाल लागणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी (India vs New Zealand WTC Final) दोन विकेटच्या मोबदल्यात 101 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज तंबूत परतले आहेत. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडचा संघ अद्याप 116 धावांनी पिछाडीवर आहे. भारतीय संघानं पहिल्या डावात 217 धावा केल्या आहेत.

-चौथ्या दिवशी एकही चेंडू न खेळता दोन्ही संघावर आली लंच करण्याची

पावासामुळे चौथ्या दिवशीच्या खेळाला उशीराने सुरुवात होणार आहे. आयसीसीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT