Tulsi Esakal
लाइफस्टाइल

Winter Health: रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

थंडीत राहील स्वस्त

सकाळ डिजिटल टीम

सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर गेली दोन दिवस थंडीला सुरुवात झाली आहे. ऊबदार कपडे, पायमोजे याची आता सर्वांची शोधाशोध सुरु झाली असेल. थंडीच्या दिवसात सर्दी- खोकला असे आजार उध्दभवतात. अशावेळी तुळशीची पाने खाणे शरीरासाठी फायदेमंद असते. ही पाने तुम्ही चहात टाकूनही पिऊ शकता. याबरोबरच रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्याने शरीराला याचा खुप फायदा होतो. तुळशीच्या पानात गुणकारी तत्व असतात. यात असणारे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. याशिवाय ही पाने खाण्याचे पाच फायदे आहेत. कोणते ते जाणून घेऊया.

मेटाबाॅलिजम : तुळशीची पाने आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असतात. ते चयापचय सिस्टम दुरुस्त करण्यास मदत करतात. याशिवाय तुळशीची पाने खाण्याने अॅसिडिटी, गॅस दूर होते. पचनक्रिया सुधारते.

बाॅडी डिटाॅक्सीफिकेशन : तुळशीच्या पानात बाॅडी डिटाॅक्स करण्याची क्षमता असते. यातील गुणकारी तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.

तोंडाचे बॅक्टेरिया घालवतो:

तुळशीची पाने तोंडात लपलेले बॅक्टेरिया साफ करतात. हे पान तोंडात टाकल्याने श्वासात ताजेपणा जाणवतो.

सर्दी-खोकला

थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला हे संसर्गजन्य आजार होतात. अशावेळी तुळशीची पाने नियमित खाल्याने या आजारापासून लढण्यास मदत होते.

तणाव कमी करतो: तुळशीची पाने नियमित खाण्य़ाने तणाव दूर होतो.पानांमध्ये अॅडाप्टोजेन असतात जे मानसिक तणाव कमी करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT