लग्न झाल्यानंतर आपल्या आयुष्यात अनेक बदल घडतात. विशेष म्हणजे जीवनात होत असलेले हे बदल प्रत्येक जण आनंदाने स्वीकारत असतो. परंतु, हे बदल घडत असताना प्रत्येक नववधूच्या व वराच्या मनात असंख्य प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. म्हणूनच, लग्नानंतर आयुष्यात कोणते बदल होतात ते पाहुयात. (9 things that change after you get married)
१.लग्नानंतर प्रत्येक जोडप्याचं नातं अधिक खुलतं. भावनिक, मानसिकरित्या ते एकमेकांचा विचार करु लागतात. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम पार्टनरचा विचार केला जातो.
२. एकाच छताखाली राहत असताना एकमेकांमध्ये जितकं प्रेम असतं. तितकेच काही वेळा मतभेद, वैचारिक वाददेखील होतात. परंतु, हे वाद तात्पुरत्या स्वरुपाचे असतात.
३. अरेंजमॅरेज झाल्यावर अनेकदा पार्टनरसमोर व्यक्त होताना काही जण लाजतात किंवा त्यांना अनकन्फर्टेबल वाटतं. परंतु, बराच काळ एकमेकांच्या सहवासात राहिल्यानंतर कालांतराने कन्फर्टेबल वाटू लागतं. उदा. अनेकदा पार्टनरसमोर वॉशरुमला जाता, ब्रशिंग करताना लाजल्यासारखं वाटतं. मात्र, कालांतराने ते सहज या सगळ्या गोष्टी करु लागतात.
४. परिस्थितीचं गांभीर्य कळतं. लग्नापूर्वी प्रत्येक व्यक्ती स्वच्छंदपणे वावरत असतो. परंतु, लग्नानंतर जबाबदारीची जाणीव होते. परिस्थितीचं भान येतं. त्यानुसार व्यक्ती रिअॅक्ट होतो.
५. घरातील वातावरण बदलून जातं. अनेक ठिकाणी नवीन सून घरात आल्यावर आनंदाचं वातावरण निर्माण होतं. तर काही वेळा वैचारिक भेद होऊन वाददेखील होतात.
६. मुलींमधील अल्लडपणा, मस्तीखोरपणा कमी होण्यासोबतच त्यांच्यातील जबाबदारीची भावना आपोआप वाढते.
७. नातेवाईक, कुटुंब जोडून ठेवण्याचं महत्त्व समजतं.
८.बऱ्याचदा इतरांच्या आनंदासाठी आपला आनंद बाजूला ठेवावा लागतो.
९. दोन्ही कुटुंबाकडून प्रेम मिळतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.