Chaturmas 2024  esakal
लाइफस्टाइल

Chaturmas 2024: चातुर्मासात भगवान विष्णू निद्रासनात का जातात? जाणून घ्या यामागील रहस्य

Chaturmas 2024: आषाढ महिना हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Chaturmas 2024 : आज संपूर्ण देशभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्व एकादशींपैकी सर्वात मोठी समजली जाणारी ही आषाढी एकादशी देवशयनी आणि महाएकादशी म्हणून ओळखली जाते. आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असून, सर्व वारकरी, भक्तगण विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन झाले आहेत.

विठूरायाचे सावळे रूप, हे भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो. या महिन्यात विष्णूंची पूजा, आराधना केल्याने सर्व दु:खे दूर होतात असे मानले जाते.

आजच्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. त्यामुळे, पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तसेच, या काळात भगवान विष्णू आणि इतर देव हे निद्रासनात (झोपी जातात) जातात. आजपासून हा चातुर्मास सुरू झाला असून, तो १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असणार आहे. भगवान विष्णू चातुर्मासात निद्रासनात का जातात? त्यामागचे रहस्य काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात.

आषाढी एकादशीच्या दिवशी चातुर्मासाला सुरूवात होते. याच काळात भगवान विष्णू पुढील कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे तब्बल चार महिन्यांसाठी निद्रासनात जातात. ते निद्रासनात जाण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती पौराणिक कथा अशी की, राजा बळीने जेव्हा तिन्ही दरबारांचा ताबा घेतला होता, तेव्हा इंद्रदेवाने भगवान विष्णूंकडे मदत मागितली होती.

त्यावेळी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बळीकडे तीन पावले जमिन मागितली. त्यावर वामन अवतारातील भगवान विष्णूंनी पृथ्वी आणि आकाश हे दोन पावलांमध्ये मोजले आणि तिसरे पाऊल कुठे टाकायचे? असा प्रश्न राजा बळीला केला. 

त्यावरून, राजा बळीला समजले की, हा कुणी सामान्य माणूस नाही आणि त्यांनी वामन अवतारातील विष्णूला त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितला. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी तिन्ही दरबार राजा बळीच्या ताब्यातून (तिनों लोक) मुक्त केले.

राजा बळीने केलेले दान आणि भक्ती पाहून भगवान विष्णूंनी त्यांना हवे ते वरदान मागण्यास सांगितले. त्यावर राजा बळी म्हणाले की, तू माझ्यासोबत पाताळात चल आणि तिथेच राहा. भगवान विष्णूंनी आपल्या या भक्ताची आज्ञा मान्य करून ते पाताळात राहण्यास गेले. त्यामुळे, सर्व देवी-देवता आणि लक्ष्मी देवी काळजीत पडले. देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूंना यातून मुक्त करण्यासाठी एक युक्ती केली.

त्यांनी एका गरीब स्त्रीचे रूप धारण केले आणि राजा बळीला राखी बांधली. त्या बदल्यात त्यांनी राजा बळीकडे भगवान विष्णूंची मागणी केली. अशा प्रकारे देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूंची सुटका केली. परंतु, भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताला निराश न करता, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत पाताळात राहण्याचे वचन दिले.

याच वचनामुळे भगवान विष्णू हे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत म्हणजे तब्बल ४ महिने निद्रासनात जातात. या काळात भगवान शिवसृष्टीची काळजी घेतात. आषाढ महिन्यानंतर भगवान शंकरांचा आवडता महिना श्रावण येतो. याकाळात सर्व भक्त महादेवांची पूजा करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT