लाइफस्टाइल

Couple Lifestyle : लग्न ठरलेल्या जोडप्यांनी या बदलांना रहावे तयार; तरच टिकेल नातं

सिंगल लाईफ एन्जॉय करणाऱ्यांनी भविष्यातील पार्टनरचाही विचार करावा

सकाळ डिजिटल टीम

पूणे : लोक रिलेशनशिपमध्ये येतात आणि एकमेकांना डेट करायला लागतात. तेव्हा त्यांचे आयुष्यही बदलू लागते. डेटिंग असो किंवा लग्न, रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर दोघांच्या आयुष्यात बरेच बदल होतात. सुरुवातीचे काही दिवस नात नवं असतं.

नव्याचे नऊ दिवस चांगले अगदी मजेत एकमेकांना समजून घेण्यात जातात. एकमेकांना काय आवडत, काय नाही याची काळजी घेतली जाते. पण कालांतराने नातं जूनं होतं आणि मग नात्यात स्पेशल असं काहीच उरत नाही. अशावेळी आपली माणसं कधीही समजवायला येत नाहीत.

आतापर्यंत सिंगल लाईफ एन्जॉय करणाऱ्यांना भविष्यातील पार्टनरचाही विचार करावा लागतो. लग्न झाल्यावरही अनेकजण आपण सिंगल आहोत असेच वागतात. त्यामुळे लग्न झाल्यानंतर कोणते बदल करायला हवेत. याबद्दल जाणून घेऊयात.

लग्नांनंतर लोक जोडीदाराच्या वेळेशी जुळवून घेऊ लागतात. सकाळी उठण्याची वेळ, नाश्ता करण्याची, जेवणाची या वेळा एकच होतात.त्यामुळे जोडीदाराचा विचार करून त्याप्रमाणे त्याच्या वेळेशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे.

सिंगल लाइफमध्ये पती-पत्नीवर कसलीही जबाबदारी नसते. पण लग्नानंतर एकमेकांची जबाबदारी त्यांच्यावर येते. जोडीदाराच्या गरजा, त्याला हवं नको पाहणे याची जबाबदारी घ्यावी लागते.

अनेकदा आपल्याला आवडत नाहीत त्या गोष्टी जोडीदाराला आवडू लागतात. त्यामुळे त्यातही बदल करावा लागतो. पतीला अ‍ॅक्शन चित्रपट आवडत असेल तरी ती आवड बाजूला सारून तो पत्नीच्या आवडीचा रोमँटिक चित्रपट पाहतो.लग्नाआधी मित्र कलीग यांना देण्यात येणारी प्राथमिकता लग्नानंतर रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला द्यावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT