skin care
skin care skin care
लाइफस्टाइल

हाताची त्वचा तरुण ठेवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: हातांच्या त्वचेचा कोरडेपणा आणि रिंकल्स तुम्हाला कमी वयातच होऊ लागल्यात तर खूप खराब वाटू लागते. यावरून तुमचे कमी वय असतानाही जास्त वाटू लागते. याकडे वेळीच लक्ष नाही दिलं तर त्याचा मोठा तोटा होऊ शकतो. याचं कारण आपण वारंवार हात धुण्यासाठी साबणाचा वापर करतो त्याचा त्वचेवर दुष्परिणाम पडतो. तसेच सध्या कोरोनामुळे सॅनिटाइजरचा वापरही वाढला आहे.

आपले हात वारंवार धूळीत, मातीत तसेच घामात असल्यास त्याचाही वाईट परिणाम शरीरावर होतो. जर तुमच्या शरीराची त्वचेची योग्य काळजी घेतली तर तुम्ही अजून तरुण दिसू लागाल.

या चूका तुमच्या हाताच्या त्वचेसाठी धोकादायक ठरतात-

- जर हातांना योग्य पद्धतीने हायड्रेटेड नाही केले तर

- त्वचेवरील डेड त्वचा नाही काढली तर.

- वारंवार त्वचेवर साबणाचा उपयोग केला तर.

- स्मोकिंग करणाऱ्यांचेही हात लवकर खराब होऊ शकतात.

घरगुती उपायांनी बनवा त्वचेला तरुण-

१. पहिली पद्धत-

- ताजे एलोवेरा जेल घ्या.

- त्यानंतर ते तुमच्या त्वचेवर स्क्रब करा. जर तुमच्याकडे ताजा जेल उपलब्ध नसेल तर तुम्ही ते बाजारातून घेऊ शकता. ताजे जेल त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

-दोन्ही हातांवर ते जेल व्यवस्थित लावून घ्या.

२. दुसरी पद्धत-

- सगळ्यात पहिल्यांदा दोन चमचे नारळ तेल घ्या. जर ते कोल्ड नारळ तेल असेल तर ते बरंच फायदेशीर ठरते.

- यात तुम्हाला दोन व्हिटॅमिन ईच्या गोळ्या टाकाव्या लागणार आहेत.

- त्यानंतर ते त्वचेवर व्यवस्थित लावून घ्या.

- हे तेल बोटांच्या मधोमध, नखांखाली व्यवस्थित लावून घ्यावे.

याचा बराच उपयोग तुमची हाताची त्वचा योग्य ठेवण्यास होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT