water sakal
लाइफस्टाइल

Health Care News: गोड खाऊन लगेच पाणी पिण्याची चूक करताय? थांबा, वाचा याचे दुष्परिणाम…

निरोगी राहण्यासाठी दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्यास सांगितले जाते.

Aishwarya Musale

आजच्या व्यस्त जीवनात स्वतःला निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा अनेक छोट्या-छोट्या चुका कळत-नकळत केल्या जातात, त्या आरोग्य बिघडवण्यासाठी पुरेशा असतात. अशाच एका आजाराचे नाव आहे मधुमेह.

पण त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रक्तातील साखरेची पातळी ओव्हरफ्लोमुळे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत, निरोगी जीवनशैली आणि चांगल्या खाण्याच्या सवयी सर्वात महत्वाचे आहे. तसेच गोड खाणे टाळावे.

गोड खाणे मधुमेहामध्ये हानिकारक असू शकते. गोड खाल्ल्यास लगेच पाणी पिण्याची चूक करू नका. गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास भाग पाडत आहात.

आता प्रश्न असा आहे की मिठाई खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे? आहारतज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया...

टाइप-2 मधुमेहाचा धोका जास्त असतो

आहारतज्ञ सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर सर्वप्रथम त्याने गोड खाणे टाळावे. यानंतरही कोणी गोड खात असेल तर लगेच पाणी पिणेही टाळावे. कारण ज्या लोकांना गोड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते त्यांना टाइप-2 मधुमेहाचा धोका झपाट्याने वाढतो. पाण्यासोबत ग्लुकोज शरीरात झपाट्याने शोषले जाते.

तज्ज्ञांच्या मते, गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. असे केल्यास शरीरात ग्लुकोज झपाट्याने शोषून घेणे सुरू होईल. त्यामुळे साखरेची पातळीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. अशा परिस्थितीत मिठाई खाल्ल्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी पाणी पिणे चांगले. शक्य असल्यास, आपण ही वेळ वाढवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT