health sakal
लाइफस्टाइल

Health Tips: पावसाळ्यात अन्न लवकर खराब होते? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अन्न खराब होण्यापासून वाचवणे.

Aishwarya Musale

पावसाळा खूप आल्हाददायक असतो. उष्णतेपासून ब-याच अंशी दिलासा मिळाला असला तरी हा हंगामही कमी आव्हानात्मक नाही. पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अन्न खराब होण्यापासून वाचवणे. अन्नपदार्थ दीर्घकाळ साठवून ठेवणे फार कठीण होते.

पावसाळ्यात भरपूर ओलसरपणा आणि ओलावा असतो, त्यामुळे अन्नाची चव बदलते आणि ते खराब होते. फंगस आणि बॅक्टेरिया असल्यामुळे ते खाणे म्हणजे रोगांना मेजवानी देण्यासारखे आहे.या ऋतूत तुम्हीही अन्न खराब होण्याने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला ते टाळण्याचा सर्वात सोपा उपाय सांगतो

अन्न काचेच्या भांड्यात ठेवा

पावसाळा दमट असतो. या काळात स्नॅक्स आणि इतर पॅक केलेल्या गोष्टी जास्त काळ बरोबर ठेवणे कठीण जाते. या गोष्टी तुम्ही काचेच्या बरणीत ठेवून बराच काळ वापरू शकता. अशा वस्तू एअर टाईट बरणीत साठवा. सामान झिप लॉक बॅगमध्ये देखील ठेवता येते.

ओलसर ठिकाणी साठवू नका

अनेक वेळा अन्न अशा ठिकाणी ठेवले जाते, जेथे ओलसरपणा किंवा ओलावा असतो. अशा ठिकाणी बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच अन्नपदार्थ फक्त कोरड्या जागी ठेवा.

फ्रेशनेसची काळजी घ्या

जेव्हा तुम्ही फळे किंवा भाज्या खरेदी करता तेव्हा त्यांच्या फ्रेशनेसची पूर्ण काळजी घ्या, कारण दीर्घकाळ साठवून ठेवलेल्या वस्तू खरेदी केल्यानंतर त्यापासून बनवलेले पदार्थ दीर्घकाळ हाताळणे फार कठीण जाते. जिथे ताज्या वस्तू ठेवल्या जातात तिथून वस्तू खरेदी करा.

दूध-दही तूप साठवण्याची पद्धत

या ऋतूत दूध, दही, तूप किंवा मलई यांसारखे दुग्धजन्य पदार्थ जपून ठेवायचे असतील तर ० ते ५ अंश तापमानात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. त्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत आणि सामान बराच काळ ताजा राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT