Mahavir Jayanti 2024
Mahavir Jayanti 2024 Sakal
लाइफस्टाइल

Mahavir Jayanti 2024: महावीर जयंतीनिमित्त जाणून घ्या भगवान महावीरांचे पाच सिद्धांत

पुजा बोनकिले

भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. जैन धर्मात महावीर स्वामींची पूजा केली जाते. त्यांना विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार महावीरजींचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला झाला होता. हा दिवस महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो. महावीर जयंतीचे महत्त्व जाणून घेऊया.

महावीर स्वामींचा जन्म इ.स.पूर्व 599 मध्ये झाला. हा त्यांचा २६२२ वा वाढदिवस असेल. पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशी 20 एप्रिल रोजी रात्री 10:41 वाजता सुरू होत आहे आणि 22 एप्रिल रोजी दुपारी 1:11 वाजता समाप्त होईल. उदय तिथीचे महत्त्व देत 21 एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे.

महावीर जयंतीचे महत्व

महावीर जयंतीच्या दिवशी जैन धर्मीय लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी ते धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात आणि भगवान महावीरांची मनोभावे पूजा करतात. महावीर यांनी ज्ञानप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. कठोर तपश्चर्या केल्यावर त्यांना वर्धमानातून महावीर म्हटले गेले.

  • जैन धर्माची तत्त्वे

जैन धर्माची पाच मुख्य तत्त्वे आहेत. यामध्ये सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य यांचा समावेश होतो. महावीर यांनी अहिंसेचा संदेश दिला होता.

ते सत्यालाही महत्त्व देतात. जीवनात नेहमी सत्याचे पालन केले पाहिजे. अपरिग्रह म्हणजे माणसाने लोभी नसावे. ही भावना संपत्ती, पैसा आणि वस्त्र यांची प्राप्ती दूर करते.

अस्तेय म्हणजे चोरी करू नये. जैन धर्माच्या शिकवणीतही याचा समावेश आहे. चोरीचा विचारही मनात आणू नका. महावीर यांनी ब्रह्मचर्य हे तत्व मानले आहे. याचा अर्थ सदाचारी जीवन जगणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT