Monsoon Skin care sakal
लाइफस्टाइल

Monsoon Skin Care Tips : पावसाच्या पाण्यामुळे तुमची त्वचा टॅन झालीय? मग 'या' सोप्या पद्धतींनी चेहऱ्याचे टॅनिंग काढून टाका

पावसाच्या पाण्यामुळे टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय फॉलो करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्याचा त्वचेवर टॅनिंगसह अनेक प्रकारे परिणाम होतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे की पावसाच्या पाण्यामुळे त्वचेला टॅनिंगची समस्या देखील होऊ शकते. पावसाच्या पाण्यामुळे त्वचा टॅनिंग होण्याची अनेक कारणे असू शकतात.

अनेक लोक असेही मानतात की पावसाचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर असते, पण असे नाही. पावसाच्या पाण्यामुळे त्वचा टॅन होते. टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय फॉलो करू शकता.

पावसाच्या पाण्यामुळे होणारे टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय

1. लिंबू आणि मध

लागणारे साहित्य

  • 1 चमचा लिंबाचा रस

  • 1 चमचा मध

बनवणायची पद्धत

  • एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून चेहऱ्याला लावा.

  • 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

  • मध त्वचेला मॉइश्चरायझ करते.

2. टोमॅटोचा रस

लागणारे साहित्य

  • 1 टीस्पून टोमॅटो रस

  • 1 टीस्पून गुलाबपाणी

बनवणायची पद्धत

  • ताज्या टोमॅटोचा रस काढा, त्यात गुलाब पाणी मिसळा आणि चेहऱ्याला लावा.

  • 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

  • टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते जे सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते.

3. बटाट्याचा रस

लागणारे साहित्य

  • 1 टीस्पून बटाट्याचा रस

  • 1 टीस्पून एलोवेरा जेल

बनवणायची पद्धत

  • कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढा आणि त्यात एलोवेरा जेल घाला. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.

  • 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.

  • बटाट्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेवरील डाग कमी करतात.

4. दही आणि हळद

लागणारे साहित्य

  • 1 चमचा दही

  • चिमूटभर हळद

बनवणायची पद्धत

  • एक चमचा दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट बनवा.

  • ही पेस्ट त्वचेवर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या.

  • यानंतर थंड पाण्याने धुवा.

  • दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते ज्यामुळे त्वचेला ओलावा आणि मुलायमपणा येतो आणि हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

Baba Adhav : कशी सुरू झाली होती कष्टाची भाकर? पंतप्रधानांनी घेतला होता आस्वाद, बाबा आढावांची हृदयस्पर्शी आठवण

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT