Relationship  sakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: ब्रेकअपमुळे निराश आहात? अशी करा आयुष्याची नव्याने सुरुवात

ब्रेकअपनंतर स्वत:ला कसे सावरायचे, जाणून घ्या.

Aishwarya Musale

ब्रेकअप किंवा घटस्फोट अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला खूप वाईटरित्या मनातून खचवतात. या परिस्थितून गेल्यानंतर काही लोक असे वागतात की आता त्यांच्याकडे जगण्यासाठी अजून काही कारणच उरलं नाहीये.

त्यांच्या डोक्यात सतत हेच विचार येत असतात की आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं आज तोच व्यक्ती आपल्या आयुष्यात नाहीये आणि हीच गोष्ट त्यांना डिप्रेशनसोबतच अनेक नकारात्मक गोष्टींनी भरुन टाकते.

ब्रेकअपला अपयश समजू नका

आपण प्रेमात काही उगाच पडत नाही; एखादा माणूस आपल्या मनाच्या खूप जवळ येतो, आपल्या सहवासात सतत असतो, आपणही त्याला मनातलं सगळ सांगतो, पण अचानक जेव्हा छोट्याश्या कारणाने ते नातं तुटतं, तर आपला हिरमुसड होतो आणि आपल्याला हे खूप मोठं अपयश वाटू शकतं.

सर्वात आधी, तुम्ही ब्रेकअप झाला आहे हे स्वीकारा आणि दोघांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत हे देखील स्वीकारा. तुमच्या मनात कोणते गिल्ट असेल तर ते काढून टाका आणि या गोष्टी लक्षात ठेवा.

काही दिवस बाहेर फिरायला जा

जर तुम्ही एका जागीच राहिलात तर तुम्ही त्याच व्यक्तीचा विचार करत राहाल आणि स्वतःला त्रास करून घ्याल त्यापेक्षा जरा काही दिवस दुसरीकडे फिरायला गेलात तर वातावरण बदलणं तर होईलच पण तुम्हालाही जरा बरं वाटेल.

स्वतःला कधीही कमी लेखू नका

ब्रेकअपचे कारण काहीही असो, परंतु स्वतःला दोष देण थांबवा कारण याने तुम्हाला अस वाटेल की तुम्ही कुठेतरी कमी पडलात आणि नातेसंबंध हाताळू शकत नाही. आपल्या नात्यातील कटू आठवणी विसरून पुढे जाण्यातच शहाणपणा आहे, तरच तुम्ही आत्मविश्वासाने आयुष्य जगू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT