Fruits  Sakal
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. अन्यथा आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

पुजा बोनकिले

फळे खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला घरातील अनेक मोठी मंडळी देत असतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पिणे पिणे गरजेचे असते. पण चुकूनही काही फळांवर पाणी पिणे हानिकारक ठरू शकते. हे फळ कोणती आहेत जाणून घेऊया.

केळी

केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ टाळावे.

जांभूळ

जांभुळ खाणे आरोग्यदायी असते. यामुळे आपल्या आहारात या फळाचा समावेश करावा. जांभूळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास सर्दी किंवा खोरला होऊ शकतो.

टरबूज

टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास त्याचा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅकवर परिणाम होतो. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण खुप जास्त असते. टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास बॅक्टेरिया थेट पोटात पोहोचतात. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.

खरबूज

उन्हाळ्यात खरबुज खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते. कारण या फळामध्ये पाण्याचे प्रमाण भरपुर असते. तसेच या फळामध्ये नैसर्गिकरित्या साखर आणि फायबर असते. यामुळे खरबुज खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे. यामुळे पचनसंस्था बिघडू शकते.

इतर रसाळ फळे

काकडी, स्ट्रॉबेरी, संत्री, द्राक्षे यासारख्या रसाळ फळांचे सेवन केल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका. कारण पाणी प्यायल्यास पोटाची पीएच पातळी बिघडते. यामुळे अतिसार आणि पचनसंस्था बिघडू शकते.

किती वेळानंतर पाणी प्यावे?

तज्ज्ञांच्या मते, कोणतेही रसाळ फळे खाल्ल्यानंतर एक तास झाल्यानंतर पाणी पिणे आरोग्यदायी मानले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT