देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने कारच्या किमतीत वाढ केली आहे.
सोलापूर : तुम्ही नवीन कार (Car) घ्यायच्या विचारात असाल तर आधी ही बातमी वाचा; कारण देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) कारच्या किमतीत वाढ केली आहे. सेलेरियो वगळता सर्व कारच्या किमतीत 1.9 टक्क्यांनी वाढ केल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवीन किमती सोमवारपासून (ता. 6) लागू झाल्या आहेत. वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार कारच्या नवीन किमतीत वाढ करण्यात आली आहे.
कंपनीने सांगितले की, कारच्या किमतीत वाढ होण्यामागील कारण कच्च्या मालाच्या किमतीत सतत वाढ हे आहे. कंपनी इनपुट खर्चाचा संपूर्ण भार स्वतः घेऊ शकत नाही, म्हणून ती त्याचा काही भाग ग्राहकांवर टाकत आहे.
मारुती कारच्या या काही मॉडेल्स...
18 हजारांनी वाढली "अल्टो'ची किंमत
नवीन किमतींनंतर मारुतीच्या कार 10 ते 25 हजार रुपयांनी महाग झाल्या आहेत. कंपनीची एंट्री-लेव्हल अल्टो कार आता ऑन रोड 18 हजार रुपयांपर्यंत महाग झाली आहे. त्याचप्रमाणे स्विफ्ट, डिझायर, इको, एर्टिगा, एस-प्रेसो यांसारखी वाहनेही 25 हजारांपर्यंत महाग झाली आहेत.
मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या नव्या किमती
मारुती सुझुकीच्या नवीन किमती वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरल्या आहेत. काही राज्यांमध्ये अल्टोच्या किमतीत 18 हजार रुपयांनी वाढ झाली आहे, काही राज्यांमध्ये 16 हजार रुपयांनी. देशाची राजधानी दिल्लीतील नवीन दर पाहा.
मॉडेलची किंमत : किती रुपयांनी महाग (नवी दिल्ली)
अल्टो 800 : 16,100 रुपयांपर्यंत
एस-प्रेसो : 7,500 रुपयांपर्यंत
वॅगनआर : 12,500 रुपयांपर्यंत
विटारा ब्रेजा : 10,000 रुपयांपर्यंत
डिझायर : 10,000 रुपयांपर्यंत
अर्टिगा : 20,000 रुपयांपर्यंत
स्विफ्ट : 13,000 रुपयांपर्यंत
बलेनो : 15,200 रुपयांपर्यंत
इग्निस : 14,680 रुपयांपर्यंत
सियाज : 20,000 रुपयांपर्यंत
XL6 : 12,311 रुपयांपर्यंत
एस-क्रॉस : 20,500 रुपयांपर्यंत
टूर-एस : 20,300 रुपयांपर्यंत
ईको : 22,500 रुपयांपर्यंत
यावर्षी किमती वाढल्या चारपट
असे नाही की मारुतीने आपल्या कारच्या किमती या वर्षी पहिल्यांदाच वाढवल्या आहेत; याआधीही कारच्या किंमती तीनवेळा वाढवल्या आहेत. प्रथम जानेवारीत कंपनीने कारच्या किमतीत 34,000 रुपयांपर्यंत वाढ केली होती. एप्रिलमध्ये काही मॉडेल्समध्ये 22,500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतर जुलैमध्ये कंपनीने पुन्हा एकदा किमतीत वाढ केली. अशा परिस्थितीत आता कार चौथ्यांदा महाग झाल्या आहेत.
किमती वाढण्याची तीन मुख्य कारणे
स्टील महाग : वाहनांच्या किमतीत झालेल्या वाढीसंदर्भात कंपनीचे म्हणणे आहे की, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वाहन तयार करण्याचा खर्चही वाढत आहे. विशेषत: स्टीलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या एका वर्षात स्टीलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
सेमीकंडक्टर्सची कमतरता : जगभरातील सेमीकंडक्टर्सची मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये अंतर वाढत आहे. खराब हवामान आणि साथीच्या आजारांमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे कारखाने बंद करावे लागले. अशा परिस्थितीत कार कंपन्यांना जास्त पैसे देऊन सेमीकंडक्टर्स खरेदी करावे लागते.
वाहतूक खर्च वाढला : याबरोबरच बाहेरून येणाऱ्या वाहनांवर कर लावला जात आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूकही महाग झाली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम वाहनांच्या किमतीवर होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.