वर्षभरात चौथ्यांदा महागली मारुती कार! Canva
लाइफस्टाइल

वर्षभरात चौथ्यांदा महागली मारुती कार! 25 हजारांपर्यंत अधिक खर्च

वर्षभरात चौथ्यांदा महागली मारुती कार! करावा लागेल 25 हजारांपर्यंत अधिक खर्च

श्रीनिवास दुध्याल

देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने कारच्या किमतीत वाढ केली आहे.

सोलापूर : तुम्ही नवीन कार (Car) घ्यायच्या विचारात असाल तर आधी ही बातमी वाचा; कारण देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) कारच्या किमतीत वाढ केली आहे. सेलेरियो वगळता सर्व कारच्या किमतीत 1.9 टक्‍क्‍यांनी वाढ केल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवीन किमती सोमवारपासून (ता. 6) लागू झाल्या आहेत. वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार कारच्या नवीन किमतीत वाढ करण्यात आली आहे.

कंपनीने सांगितले की, कारच्या किमतीत वाढ होण्यामागील कारण कच्च्या मालाच्या किमतीत सतत वाढ हे आहे. कंपनी इनपुट खर्चाचा संपूर्ण भार स्वतः घेऊ शकत नाही, म्हणून ती त्याचा काही भाग ग्राहकांवर टाकत आहे.

मारुती कारच्या या काही मॉडेल्स...

एस-प्रेसो
वॅगनआर
विटारा ब्रेजा
डिझायर
अर्टिगा
बलेनो
अल्टो 800

18 हजारांनी वाढली "अल्टो'ची किंमत

नवीन किमतींनंतर मारुतीच्या कार 10 ते 25 हजार रुपयांनी महाग झाल्या आहेत. कंपनीची एंट्री-लेव्हल अल्टो कार आता ऑन रोड 18 हजार रुपयांपर्यंत महाग झाली आहे. त्याचप्रमाणे स्विफ्ट, डिझायर, इको, एर्टिगा, एस-प्रेसो यांसारखी वाहनेही 25 हजारांपर्यंत महाग झाली आहेत.

मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या नव्या किमती

मारुती सुझुकीच्या नवीन किमती वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरल्या आहेत. काही राज्यांमध्ये अल्टोच्या किमतीत 18 हजार रुपयांनी वाढ झाली आहे, काही राज्यांमध्ये 16 हजार रुपयांनी. देशाची राजधानी दिल्लीतील नवीन दर पाहा.

मॉडेलची किंमत : किती रुपयांनी महाग (नवी दिल्ली)

  • अल्टो 800 : 16,100 रुपयांपर्यंत

  • एस-प्रेसो : 7,500 रुपयांपर्यंत

  • वॅगनआर : 12,500 रुपयांपर्यंत

  • विटारा ब्रेजा : 10,000 रुपयांपर्यंत

  • डिझायर : 10,000 रुपयांपर्यंत

  • अर्टिगा : 20,000 रुपयांपर्यंत

  • स्विफ्ट : 13,000 रुपयांपर्यंत

  • बलेनो : 15,200 रुपयांपर्यंत

  • इग्निस : 14,680 रुपयांपर्यंत

  • सियाज : 20,000 रुपयांपर्यंत

  • XL6 : 12,311 रुपयांपर्यंत

  • एस-क्रॉस : 20,500 रुपयांपर्यंत

  • टूर-एस : 20,300 रुपयांपर्यंत

  • ईको : 22,500 रुपयांपर्यंत

यावर्षी किमती वाढल्या चारपट

असे नाही की मारुतीने आपल्या कारच्या किमती या वर्षी पहिल्यांदाच वाढवल्या आहेत; याआधीही कारच्या किंमती तीनवेळा वाढवल्या आहेत. प्रथम जानेवारीत कंपनीने कारच्या किमतीत 34,000 रुपयांपर्यंत वाढ केली होती. एप्रिलमध्ये काही मॉडेल्समध्ये 22,500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतर जुलैमध्ये कंपनीने पुन्हा एकदा किमतीत वाढ केली. अशा परिस्थितीत आता कार चौथ्यांदा महाग झाल्या आहेत.

किमती वाढण्याची तीन मुख्य कारणे

  • स्टील महाग : वाहनांच्या किमतीत झालेल्या वाढीसंदर्भात कंपनीचे म्हणणे आहे की, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वाहन तयार करण्याचा खर्चही वाढत आहे. विशेषत: स्टीलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या एका वर्षात स्टीलच्या किमती 50 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत.

  • सेमीकंडक्‍टर्सची कमतरता : जगभरातील सेमीकंडक्‍टर्सची मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये अंतर वाढत आहे. खराब हवामान आणि साथीच्या आजारांमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे कारखाने बंद करावे लागले. अशा परिस्थितीत कार कंपन्यांना जास्त पैसे देऊन सेमीकंडक्‍टर्स खरेदी करावे लागते.

  • वाहतूक खर्च वाढला : याबरोबरच बाहेरून येणाऱ्या वाहनांवर कर लावला जात आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूकही महाग झाली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम वाहनांच्या किमतीवर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT