vat savitri pooja sakal
लाइफस्टाइल

Vat Savitri Katha 2024 : सावित्रीने शक्कल लढवून असा वर मागितला की यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावेच लागले!

वट सावित्रीचे व्रत सवाष्ण स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी करतात. याची कथा तुम्हाला माहित आहे का?

वैष्णवी कारंजकर

सौभाग्यासाठी वट सावित्री व्रत पाळण्यात येतं. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी सूर्योदयापासून फळाचा उपवास करून किंवा निर्जल उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि प्रदक्षिणा करतात.त्यानिमित्ताने जाणून घ्या वटसावित्रीची कथा...

मद्रदेशावर अश्वपती नावाच्या धर्मनिष्ठ राजाने राज्य केले, त्याला मूल झाले नाही, परंतु काही काळानंतर त्याला मुलगी झाली. तिचं नाव सावित्री होतं. लग्नासाठी पात्र ठरल्यावर सावित्रीने सत्यवानला पती म्हणून निवडलं. लग्नानंतर सत्यवान अल्पायुषी आहे आणि एका वर्षातच त्याचा मृत्यू होईल असं कळलं, पण सावित्री आपल्या वैवाहिक जीवनावर ठाम राहिली.

ज्या दिवशी नारदांनी सत्य़वानाच्या मृत्यूची बातमी सांगितली त्या दिवशी सावित्री सत्यवानासमवेत वनात गेली.सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढताच त्याचं डोकं दुखू लागलं. सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपला. थोड्या वेळाने यमराज दूतांसह सावित्रीसमोर उभे होते. यमराज सत्यवानाचा प्राण घेऊन दक्षिणेकडे निघाले.

सावित्रीला मागून येताना पाहून यमराज म्हणाले, 'हे पवित्र स्त्री, पुरुषाला जेवढा आधार मिळेल तितका तू तुझ्या पतीला साथ दिलीस. आता तू परत जा'. पण सावित्री म्हणाली की माझे पती जिथे जातील तिथे मी त्यांच्यासोबत जाईन.

सावित्रीची आपल्या पतीप्रती असलेली निष्ठा पाहून यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सावित्रीला वर मागायला सांगितलं. तेव्हा सावित्रीने वर मागितला, 'मला सत्यवानाच्या मुलांची आई व्हायचे आहे. यमराज तथास्तू म्हणाले. सावित्री म्हणाली की पतीशिवाय पुत्रांचं वरदान कसं शक्य आहे, तेव्हा यमराजांनी सत्यवानाच्या आत्म्याला वटवृक्षाखाली मुक्त केलं. यमाच्या आशीर्वादाने सत्यवान पुन्हा जिवंत झाला आणि सावित्रीची शंभर पुत्रांची इच्छाही पूर्ण झाली.

वरील माहिती सामान्य गृहितकांच्या आधारावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT