Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : रायबरेली, अमेठीत प्रचार थांबला;रणधुमाळीत राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ मुद्दा

देशाचे लक्ष लागलेल्या रायबरेली व अमेठी मतदारसंघात शनिवारी प्रचाराची सांगता झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे रायबरेलीमधून लढा देत आहेत. गांधी घराण्याचे मागील कित्येक दशकांपासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे.

सागर पाटील

रायबरेली : देशाचे लक्ष लागलेल्या रायबरेली व अमेठी मतदारसंघात शनिवारी प्रचाराची सांगता झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे रायबरेलीमधून लढा देत आहेत. गांधी घराण्याचे मागील कित्येक दशकांपासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे. मात्र त्या तुलनेत फारशी विकासकामे झाली नसल्याने स्थानिक व्यक्तीला निवडून देण्याचे आवाहन भाजपकडून केले जात आहे. तर राहुल गांधी यांना तुमच्याकडे सोपविल्याचे भावनिक आवाहन सोनिया गांधी यांनी केल्यानंतर गांधी यांच्या विजयाची आशा वाढली असल्याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीमध्ये येत्या सोमवारी (ता.२०) मतदान होणार असून मतदान प्रक्रियेची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. रायबरेली शहरात सर्वत्र पोलिस फौजफाटा दिसून येत आहे. या मतदारसंघात भाजपने दिनेश प्रताप सिंह या स्थानिक नेत्याला तिकीट दिले आहे. गत लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांनी त्यांचा पराभव केला होता. पण तरीही भाजपने त्यांच्यावर यावेळी विश्वास टाकला आहे.

राहुल गांधी यांच्या तोडीस तोड असा प्रचार सिंह यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्याची प्रचिती प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आली. दिनेश प्रताप सिंह यांच्यासाठी भाजपच्या स्थानिक आमदार आदिती सिंह आणि समाजवादी पक्षाचे बंडखोर आमदार मनोज पांडे यांनी शक्ती लावली नसल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रायबरेली आहे. त्याचा फटका सिंह यांना बसला तर आश्चर्य वाटू नये.

भाजपमधील बंडाळीमुळे राहुल गांधी यांना विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागणार नसल्याचे मानले जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली तर ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. अमेठीमध्ये गतवेळी राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. अमेठीमध्ये पुन्हा पराभव होण्याची शक्यता लक्षात घेत काँग्रेसने राहुल गांधी यांना रायबरेलीतून उतरवण्याची खेळी खेळली आहे.

ही खेळी यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. २०१४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत इराणी यांनी गांधी यांचा हरवत उट्टे काढले होते. यावेळी काँग्रेसने गांधी घराण्याचे निष्ठावान कार्यकर्ते के. एल. शर्मा यांना स्मृती इराणी यांच्याविरोधात उभे केले आहे. अमेठीमध्ये ओबीसी आणि मुस्लीम मते लक्षणीय प्रमाणात आहेत. याशिवाय ब्राह्मण, क्षत्रिय, दलित मते निर्णायक आहेत. १७.५ लाख मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघात इराणी यांना विजयाचा विश्वास असला गांधी घराण्याचा किल्ला परत ताब्यात घेण्याचा निर्धार काँग्रेसच्या के. एल. शर्मा यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT