Lok Sabha Election esakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election : कधी होतं 'डिपॉझिट' जप्त? निवडणुकीच्या प्रचारात भरतो या शब्दाने रंग

आता एवढ्या सगळ्या लोकांनी प्रत्येकी २५ हजार रुपये किंवा १० हजार रुपये भरायचे, म्हणजे खायची गोष्ट आहे का?

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारास डिपॉझिट म्हणून २५ हजार रुपयांची रक्कम भरावी लागते.

सांगली : ‘त्यानं आमच्या विरोधात लढण्याचं धाडस करू नये, आम्ही त्याचं डिपॉझिट (Deposit) जप्त केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा राजकीय सभांमध्ये दिला जातो. अनेक बडे-बडे मान्यवर ईर्षेने निवडणूक लढतात, मात्र जनमत त्यांच्या खूपच विरोधी असते आणि त्यांना अनामत रक्कम गमवावी लागते. ही रक्कम किती असते, ती कोणत्या परिस्थितीत जप्त केली जाते, पराभव झाला तरी ती परत केली जाते का, याविषयी निवडणूक आयोगाचे (Election Commission) स्पष्ट नियम आहेत.

कुणीही उठावं, निवडणुकीचा अर्ज भरावा, लढावं, असं व्हायला नको म्हणून अनामत रक्कम (डिपॉझिट) भरण्याची अट लागू करण्यात आली. रोख स्वरुपात ही रक्कम भरता येते. जास्तीत जास्त एक हजार रुपयांची नाणी घ्यावीत, असा नियमदेखील आहे. सन २०२४ ची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) जाहीर झाल्यानंतर, ‘काही ठिकाणी आम्ही पाचशे लोक मैदानात उतरवणार आहोत. त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवर (Ballot Paper) घ्यावी लागेल,’ असेही सांगितले जात आहे.

आता एवढ्या सगळ्या लोकांनी प्रत्येकी २५ हजार रुपये किंवा १० हजार रुपये भरायचे, म्हणजे खायची गोष्ट आहे का? अनुक्रमे सव्वा कोटी आणि ५० लाख एवढी ही रक्कम होते. शिवाय, अपवाद वगळता ती जप्त होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे या रकमेला निवडणुकीत खूप महत्त्व असते. अनेकांकडे कोट्यवधी रुपये असतात, २५ हजार रुपये गेले म्हणून त्यांना फार फरक पडणार नसतो, मात्र ‘डिपॉझिट जप्त’ ही राजकारणात लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. त्यामुळे भलेभले निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहणे पसंत करतात.

डिपॉझिट किती?

लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारास डिपॉझिट म्हणून २५ हजार रुपयांची रक्कम भरावी लागते. मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्याला १० हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते. विधानसभा निवडणुकीला या रकमेच्या निम्मी म्हणजे अनुक्रमे १२ हजार ५०० आणि पाच हजार रुपये एवढी डिपॉझिट रक्कम भरावी लागते. आरक्षित प्रवर्गातील व्यक्ती खुल्या जागेवर निवडणूक लढणार असेल तरी तिला सवलत लागू असते.

कधी होते परत..?

  • उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरवला गेला तर...

  • उमेदवाराने उमेदवारी अर्ज वेळेत माघार घेतला तर...

  • मतदानापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाला तर...

  • उमेदवाराचा विजय झाला तर...

  • पराभव झाला तरी १/६ एवढ्या प्रमाणात मते घेतली तर...

मतं अन् डिपॉझिट जप्त

निवडणुकीत सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण झालेल्या मतांच्या एक षष्ठांश मतांपेक्षा (झालेल्या मतदानाचा सहावा भाग) एक मत अधिक मिळाले तरी उमेदवाराला डिपॉझिट परत केले जाते. बरोबर एक षष्ठांश मते मिळाली तरी डिपॉझिट जप्त केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT