Mamata Banerjee
Mamata Banerjee sakal
लोकसभा २०२४

Mamata Banerjee : सीएए, एनआरसी येऊ देणार नाही ; ईदनिमित्तच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) आणि समान नागरी कायदा यांची अंमलबजावणी होऊ देणार नाही, अशी घोषणा करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारवर निशाणा साधला.

ईद निमित्त येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे देखील उपस्थित होते. ममता म्हणाल्या, ‘‘आता निवडणूक तोंडावर आली असल्याने काही मंडळी राज्यामध्ये दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे लोकांनी त्यांच्या कारस्थानाला बळी पडता कामा नये.

आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘सीएए’, ‘एनआरसी’ आणि समान नागरी कायद्याचा स्वीकार करणार नाही. आमच्या राज्यामध्ये त्याची सक्तीने अंमलबजावणी होऊ देणार नाही. मला द्वेष करणे माहिती नाही आणि मी कधी द्वेषमूलक भाषण देखील केलेले नाही. प्रत्येकाने शांततेमध्ये आणि सौहार्दाने राहावे अशीच आमची इच्छा आहे. आम्ही सर्वजण एक राहिलो तर कुणीही आपल्याला हात लावू शकणार नाही. अन्य कोणत्याही शक्तीला हे ऐक्य तोडू देऊ नका. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला कुणीही हात लावू शकत नाही. मी संघर्ष करत राहील.’’

जनतेचे आशीर्वाद असल्यानेच आम्ही पश्चिम बंगालमध्ये टिकू शकलो. आज आम्ही भाजपविरोधात लढत आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवावे. ‘इंडिया’बाबत काय निर्णय घ्यायचा हे आम्ही नंतर ठरवू; पण आता मात्र राज्यामध्ये आपले मत इतर पक्षाकडे जाता कामा नये म्हणून काळजी घेतली जावी.

- ममता बॅनर्जी,

मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

रक्त सांडायला तयार

‘‘सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने केंद्रीय तपास संस्थांचा वापर करून लोकांना भीती घालण्याचे काम केले जात आहे. यातही प्रामुख्याने विरोधी नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. मी तर भाजपला थेट आव्हानच दिले आहे की येथे तुरुंगांची उभारणी करून सगळ्यांनाच अटक करा. मी या देशासाठी स्वतःचे रक्त सांडायला तयार आहे. मानसिक त्रासदेखील सहन करू शकते,’’ असे ममता यांनी स्पष्ट केले.

म्हणून राज्य शांत

‘‘आता निवडणूक जवळ आली असल्यानेच अनेक बड्या मुस्लिम नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या जाऊ लागल्या आहेत. मुस्लिम समुदायाला नेमके काय हवे आहे? याची विचारणा केली जाऊ लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये शांतता आहे कारण येथील विविध समुदायांमध्ये सौहार्दाचे वातावरण आहे, ’’ असे ममता म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT